मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांना देखील स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्यावर पुजा चव्हाण आत्महत्या आरोप ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असतांना त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा भाजपने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा शिंदे सरकारमध्ये वर्णी लागली आहे. यावरून आता विरोधी पक्षाने त्यांच्याविरोधात रान पेटवलं आहे.
नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा
बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कॉलेज जीवनात आम्ही शिवसेनेत सहभागी झालो. खऱ्या अर्थानं कोणत्याही पदाची अपेक्षा मनात नव्हती. तेव्हा बाळासाहेबांचे विचारच मनात होते. राष्ट्रहित, अन्यायाच्या विरोधात लढणं त्यांचे विचार ऐकून आम्ही शिवसेनेत आलो, ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही काम केलं. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांना आज पवित्र दिनी मंत्री झाल्यावर वंदन करावं म्हणून आज या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतलं असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.
“केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू आमचे जवळचे नेते आहे. आमच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा योग्य तो मान महाराष्ट्रात ठेवला जाईल. लवकरच आम्ही सर्वजण जाऊन त्यांची भेट घेऊ. त्यांना अतिशय चांगलं खातं हे विस्तारानंतर मिळालेलं तुम्हाला दिसेल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बच्चू कडू नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यावर ते बोलत होते.
त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप आजच होणार आहे. त्यासाठी आज संध्याकाळी या सरकारमधील मंत्र्यांना खाती दिली जाणार आहेत. प्रत्येक मंत्र्याला 2 ते 3 खाती आणि 15 ऑगस्ट आधी पालकमंत्री मिळणार आहे. असं कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला. पंरतु खाती वाटप कधी करणार असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Read also
- “फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”
- “भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”
- “मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे कधीही मागणी करणार नाही”; रवी राणा
- “दुल्हन हम ले जायेंगे”, अन् IT ची देवगन स्टाईल धाड; तब्बल 390 कोटींची मालमत्ता जप्त
- “मग तुम्ही आता करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का?”; भाजपचा राष्ट्रवादीला सवाल