मुंबई : विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करताना मित्रपक्षांना विचारत घेतले नसल्याबद्दल काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात होत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी मविआचा निर्णय घेण्यात आला होता. मविआ ही विपरीत परिस्थितीमध्ये बनली होती. ही आघाडी नैसर्गिक असल्याचे आम्ही कधीच म्हटले नाही. त्यामुळे ती तुटू शकते, असं म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
“भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”
महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही. एक विपरित परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो, विरोधी पक्षात बसायचं हा जनतेचा निर्णय होता, तशी आमची मानसिकताही होती. 2019 पासुन राज्यात जे महाभारत घडतयं, ते जनता पाहत आहे. भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी होत असून लोकशाहीचा तमाशा मांडला आहे, आम्ही यासाठी भाजपचे 105 आमदार निवडून दिले नाहीत, असं जनता म्हणत असल्याचं नाना पटोले म्हणाले.
“मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे कधीही मागणी करणार नाही”; रवी राणा
विधानपरिषदेत शिंदे सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज होती. हे काम अंबादास दानवे करू शकतील. अंबादास दानवे हे आक्रमक व अभ्यासु नेता म्हणुन ओळख आहे. संसदीय आयुधांचा योग्य वापर करून ते सरकारला अडचणीत आणू शकतात. मराठवाड्यातील नव्या दमाच्या नेत्याला संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारला अडचणीत आणण्यासाठी डाव टाकला आहे.
“दुल्हन हम ले जायेंगे”, अन् IT ची देवगन स्टाईल धाड; तब्बल 390 कोटींची मालमत्ता जप्त
राज्यातील सत्ता गमवल्यानंतर शिवसेनेेने विधानपरिषदेतील विरेधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचालींना सुरूवात केली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मराठवाड्यातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची वर्णी लावावी. अशा आशयाचं पत्र शिवसेनेने विधान परिषदेच्या सभापतींना पाठवलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेने दावा सांगितला होता. याबाबत उद्धव ठाकरे यांनी सभापतींना पत्र लिहुन अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी अशी शिफारस केली आहे.
Read also
- लढणार, भिडणार, आणि जिंकणार; विरोधी पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर आंबादास दानवेंचं जंगी स्वागत
- “अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला
- “..तर राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही”; शहाजी पाटलांचा राठोडांना पाठिंबा
- “८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड
- “फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”