मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेच्या संख्याबळानुसार विधानसभेच्या विरोधी पक्षाची माळ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गळ्यात पडली. शिवसेना नेमकी कुणाची यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्ष कुणाला मिळणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य होतं.
“मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे कधीही मागणी करणार नाही”; रवी राणा
शिवसेनेचं संख्याबळ विधान परिषेदमध्ये जास्त असल्याने विधान परिषदेमधील विरोधी पदनेता पद हे शिवसेनेकडे जाणार हे नक्की होतं. मात्र त्यावर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने देखील दावा केला. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि आमदार आंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस शिवसेनेने केली. त्यानंतर त्यांची एकमताने विधान परिषेदच्या विरोधी पक्षनेता पदी निवड करण्यात आली.
“दुल्हन हम ले जायेंगे”, अन् IT ची देवगन स्टाईल धाड; तब्बल 390 कोटींची मालमत्ता जप्त
निवड झाल्यानंतर आंबादास दानवे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचं औरंगाबाद येथे जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यांचं नाचत गाजत जोरदार कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. यानंतर त्यांनी एक सुचक ट्विट केलं. त्यात त्यांनी असं म्हटलं की लढणार, भिडणार,,, आणि जिंकणार असं म्हणत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
“मग तुम्ही आता करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का?”; भाजपचा राष्ट्रवादीला सवाल
दरम्यान, आंबादास दानवे हे औरंगाबाद येथील शिवसेनेचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर त्यांनी प्रत्येक जाहीर सभेत त्यांनी बंडखोर आमदारांवर हल्ला केला. त्यांनी नेहमी आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यामुळेच त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली.
Read also
- “अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला
- “..तर राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही”; शहाजी पाटलांचा राठोडांना पाठिंबा
- “८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड
- “फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”
- “भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”