मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण या ना त्या कारणांमुळे चर्चेत आलं आहे. अलिकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेचा अंत होत असून देशात सर्वच प्रादेशिक पक्ष संपतील आणि फक्त भाजपचं शिल्लक राहिल असं वक्तव्य केलं होतं. तर महाराष्ट्रात शिवसेनेला संपवून मागचा बदला आम्ही घेतला असं भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांनी केलं. त्यातच आता भाजपचे नेते अजय कुमार मिश्रा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये बनवलीय, ती तुटू शकते”
महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 केलं. त्याचंच फळ त्यांना आता मिळतंय. त्यांनी जे लोकांसोबत केलं. ज्या प्रकारचा विश्वासघात केला. तसंच त्यांच्यासोबतही घडतंय त्यांचे नेते आमदार, खासदार त्यांना सोडून गेलेत. माझी त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पण हे त्यांच्याच कर्माचंच फळ आहे. असं केंद्रीय गृहमंत्री राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी वक्तव्य केलं आहे.
लढणार, भिडणार, आणि जिंकणार; विरोधी पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर आंबादास दानवेंचं जंगी स्वागत
भाजप कधी निवडणुकीसाठी तयारी करीत नाही. आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाहीत तर लोकांसाठी सुविधा निर्माण करून येणाऱ्या पिढीला एक चांगला देश सोपवणे हा आमचा उद्देश आहे. जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. त्यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचे वक्तव्य केले नव्हते तर त्यांनी असं सांगितलं होतं की, जर असंच काम राहिल,सरकारच्या योजना गरजवंतापर्यंत नाही पोचल्या तर निश्चितपणे यांचं प्रादेशिक पक्षांना नुकसान होईल, असंही ते म्हणाले.
“अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला
दरम्यान, जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यानंतर देशात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी भाजपवर कडाडून टिका केली. तर बिहार मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून तेजस्वी यादव सोबत नवीन सरकार स्थापन केलं.
Read also
- “पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
- “तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “महाविकास आघाडीत फूट पडणार”?नाना पटोलेंच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं सुचक वक्तव्य
- गुगलचा अजब पराक्रम; शिंदे गटातील आमदार भारतीय जनता पक्षात