बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा जवळपास 40 दिवसानंतर विस्तार करण्यात आला. यामध्ये भाजपला आणि शिंदे गटाला प्रत्येकी नऊ मंत्रीपद देण्यात आलं. तसेच यामध्ये अपक्ष आणि महिला आमदारांना डावलल्यानंतर विरोधी पक्षांनी प्रखर शब्दात टिका केली. यातच आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मंत्रिपदावरून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे.
लढणार, भिडणार, आणि जिंकणार; विरोधी पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर आंबादास दानवेंचं जंगी स्वागत
अलिकडच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी संबंधित जे लोक आहेत. त्यांना डावलले जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावर तर सातत्याने अन्याय होत आहे. आतादेखील पुढील मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतील की नाही, याबाबत शंकाच वाटते. माझ्या पंकजा मुंडे यांना शुभेच्छा आहेत. पंरतु त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी काही काळ वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे असा सल्ला देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
“अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला
पंकजा मुंडे या महादेव जानकर यांना राखी बांधायला आल्या होत्या. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असतं. त्यावेळेस सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांना समाधान करावं अशा शुभेच्या मी नव्या मंत्र्यांना देऊन झालेल्या आहेत. तसेच मी चर्चेत राहणारच नाव आहे. मात्र अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रीपद दिलं नसेल, जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा देतीलही कदाचित त्याबद्दल मला काही आक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
“..तर राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही”; शहाजी पाटलांचा राठोडांना पाठिंबा
दरम्यान, खडसे पुढे बोलताना म्हणाले की, मी देखील गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत होतो. भाजपमध्ये जे जे लोक मुंडेंच्या जवळ होते. ते आता बाजूला पडेल आहेत. मात्र पुढील काळात त्यांना न्याय मिळेल, तसेच मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार 40 दिवसांनी झाला. आता पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी आणखी किती वेळ लागेल, हे माहिती नाही. पण मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसत आहे. असंही खडसे म्हणाले.
Read also
- “तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “महाविकास आघाडीत फूट पडणार”?नाना पटोलेंच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं सुचक वक्तव्य
- गुगलचा अजब पराक्रम; शिंदे गटातील आमदार भारतीय जनता पक्षात
- “महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये बनवलीय, ती तुटू शकते”