मुंबई : विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करताना मित्रपक्षांना विचारत घेतले नसल्याबद्दल काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात होत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी मविआचा निर्णय घेण्यात आला होता. मविआ ही विपरीत परिस्थितीमध्ये बनली होती. ही आघाडी नैसर्गिक असल्याचे आम्ही कधीच म्हटले नाही. त्यामुळे ती तुटू शकते, असं म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड
सत्तेवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं अवैध सरकार आलंय. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करत आहोत. नाना पटोले काय म्हणाले हे मला माहिती नाही. त्यामुळे पटोलेंना उत्तर देणं मला आवश्यक वाटत नाही. मागील अनेक दिवसांपासून राज्यात पूर आहे. यात दहा-बारा वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या झाल्या. त्यावेळी मदत मागण्याची गरज होती. मात्र मदतीसाठी एक बैठकही झाली नाही. त्यांना फक्त मंत्रिमंडळ स्थापनेची चिंता होती. महाराष्ट्रातील जतनेला वाऱ्यावर सोडून यांचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु होते, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एनडीआरएफची टीम प्रत्येक ठिकाणी तैनात करणे गरजेचे आहे. आता राज्य सरकार सत्कार आणि सोहळ्यातून मोकळे होऊन संकटात असलेल्या राज्यातील जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
“फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”
महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही. एक विपरित परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो, विरोधी पक्षात बसायचं हा जनतेचा निर्णय होता, तशी आमची मानसिकताही होती. 2019 पासुन राज्यात जे महाभारत घडतयं, ते जनता पाहत आहे. भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी होत असून लोकशाहीचा तमाशा मांडला आहे, आम्ही यासाठी भाजपचे 105 आमदार निवडून दिले नाहीत, असं जनता म्हणत असल्याचं नाना पटोले म्हणाले.
“भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”
विधानपरिषदेत शिंदे सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज होती. हे काम अंबादास दानवे करू शकतील. अंबादास दानवे हे आक्रमक व अभ्यासु नेता म्हणुन ओळख आहे. संसदीय आयुधांचा योग्य वापर करून ते सरकारला अडचणीत आणू शकतात. मराठवाड्यातील नव्या दमाच्या नेत्याला संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारला अडचणीत आणण्यासाठी डाव टाकला आहे.
Read also
- गुगलचा अजब पराक्रम; शिंदे गटातील आमदार भारतीय जनता पक्षात
- “महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये बनवलीय, ती तुटू शकते”
- लढणार, भिडणार, आणि जिंकणार; विरोधी पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर आंबादास दानवेंचं जंगी स्वागत
- “अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला
- “..तर राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही”; शहाजी पाटलांचा राठोडांना पाठिंबा