मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन 17 ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या अधिवेशन बैठकांची दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली. या दिनदर्शिकेवरून अधिवेशन आहे का थट्टा, असा टोला काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शिंदे-फडणवास सरकावर लगावला आहे.
“..तर राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही”; शहाजी पाटलांचा राठोडांना पाठिंबा
महिनाभरापेक्षा जास्त काळ मंत्रीमंडळ विस्ताराला लागला. विरोधी पक्षांच्या टिकेनंतर तो केला. आता विस्ताराला ४८ तास उलटूनही विभाग वाटप नाही. या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग? विधीमंडळ अधिवेशन कधी होणार? शिंदे फडणवीस सरकार अधांतरी महाराष्ट्राचे भवितव्य अंधारी, असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर टिका केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. 17 ऑगस्टला अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे व सन 2022-23 च्या पुरवणी मागण्या सादर करण्याचं काम अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चालणार आहे. 18 ऑगस्टला संपुर्ण दिवस शासकीय कामकाजासाठी वेळ दिला जाणार आहे. तर 19 ऑगस्टला गोपाळकाला (दहिहंडी) निमित्त सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. याचबरोबर 20 आणि 21 ऑगस्टला शनिवार रविवार असल्यामुळे अधिवेशनाला सुट्टी असणार आहे.
“८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. 17 ऑगस्टला अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे व सन 2022-23 च्या पुरवणी मागण्या सादर करण्याचं काम अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चालणार आहे. 18 ऑगस्टला संपुर्ण दिवस शासकीय कामकाजासाठी वेळ दिला जाणार आहे. तर 19 ऑगस्टला गोपाळकाला (दहिहंडी) निमित्त सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. याचबरोबर 20 आणि 21 ऑगस्टला शनिवार रविवार असल्यामुळे अधिवेशनाला सुट्टी असणार आहे.
“फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”
राज्यातील सत्ता गमवल्यानंतर शिवसेनेेने विधानपरिषदेतील विरेधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचालींना सुरूवात केली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मराठवाड्यातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची वर्णी लावावी. अशा आशयाचं पत्र शिवसेनेने विधान परिषदेच्या सभापतींना पाठवलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेने दावा सांगितला होता. याबाबत उद्धव ठाकरे यांनी सभापतींना पत्र लिहुन अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी अशी शिफारस केली आहे.
Read also
- “महाविकास आघाडीत फूट पडणार”?नाना पटोलेंच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं सुचक वक्तव्य
- गुगलचा अजब पराक्रम; शिंदे गटातील आमदार भारतीय जनता पक्षात
- “महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये बनवलीय, ती तुटू शकते”
- लढणार, भिडणार, आणि जिंकणार; विरोधी पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर आंबादास दानवेंचं जंगी स्वागत
- “अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला