मुंबई : कांजूर मार्ग मेट्रो प्रकल्पाबाबत आरेतील वृक्षतोड ही पर्यावरणात हानीकारक आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना या प्रकल्पाला पुन्हा एकदा मंजूरी दिली. या निर्णयामध्ये भाजपचा देखील हात आहे. असं म्हणत शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली आहे.
“महाविकास आघाडीत फूट पडणार”?नाना पटोलेंच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं सुचक वक्तव्य
आरेतील कारशेड मेट्रो प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी चांगला निर्णय घेतला होता. झाडे कापून विकास करता येणार नाही. मुंबईमध्ये झाडे कमी, इमारती जास्त झाली आहेत. त्यामुळे आरेतील झाडे वाचवणे आवश्यक आहे. कारण एक झाड म्हणजे एक जीव आहे. म्हणून हजारो झाडे कापण्यापेक्षा कांजूरमार्गमधील जमीन पडलेली आहे. हा सरकारी भुखंड आहे. त्यामुळे तिथेच कारशेड व्हावी. त्यामुळे आरेतील कत्तल होणार नाही. परिणामी मुंबईकरांसाठी एक चांगलं जंगलही मिळेल. असंही देखील त्यांनी म्हटलं आहे.
गुगलचा अजब पराक्रम; शिंदे गटातील आमदार भारतीय जनता पक्षात
आरेतील कारशेड प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंना इगो नव्हे तर हा इगो देवेंद्र फडणवीस यांचा आहे. म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाचा बदल करून त्या झाडांचा आता जीव घेतला जात आहे. अशी टिका देखील सुनील राऊत यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून कांजरू मेट्रो प्रकल्पा विविध कारणांमुळे चर्चत राहिला आहे. अलिकडेच आरेतील या प्रकल्पाबाबत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी आंदोलन पुकारलं होतं.
Read also
- “पत्नी, मुलगा नाही तर ड्रायव्हर किंवा चमच्यासाठीही आता नेते उमेदवारी मागतात”; गडकरींनी टोचले राजकारण्यांचे कान
- “उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”
- “पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
- “तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल