मुंबई : विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करताना मित्रपक्षांना विचारत घेतले नसल्याबद्दल काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात होत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी मविआचा निर्णय घेण्यात आला होता. मविआ ही विपरीत परिस्थितीमध्ये बनली होती. ही आघाडी नैसर्गिक असल्याचे आम्ही कधीच म्हटले नाही. त्यामुळे ती तुटू शकते, असं म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
गजानन काळे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, एकीकडे दोस्ती करायची आणि दुसरीकडे पाठीवर वार करायचा असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच उशीरा का होईना त्यांना साक्षात्कार झाला आहे. चला आता काँग्रेसला सुध्दा नवाब सेना आणि त्याचे पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे मूळ गुण कळू लागले आहेत. हे ही नसे थोडके, महाविकासची शकलं होवू लागली आहेत. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
सत्तेवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं अवैध सरकार आलंय. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करत आहोत. नाना पटोले काय म्हणाले हे मला माहिती नाही. त्यामुळे पटोलेंना उत्तर देणं मला आवश्यक वाटत नाही. मागील अनेक दिवसांपासून राज्यात पूर आहे. यात दहा-बारा वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या झाल्या. त्यावेळी मदत मागण्याची गरज होती. मात्र मदतीसाठी एक बैठकही झाली नाही. त्यांना फक्त मंत्रिमंडळ स्थापनेची चिंता होती. महाराष्ट्रातील जतनेला वाऱ्यावर सोडून यांचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु होते, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एनडीआरएफची टीम प्रत्येक ठिकाणी तैनात करणे गरजेचे आहे. आता राज्य सरकार सत्कार आणि सोहळ्यातून मोकळे होऊन संकटात असलेल्या राज्यातील जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
“तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही. एक विपरित परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो, विरोधी पक्षात बसायचं हा जनतेचा निर्णय होता, तशी आमची मानसिकताही होती. 2019 पासुन राज्यात जे महाभारत घडतयं, ते जनता पाहत आहे. भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी होत असून लोकशाहीचा तमाशा मांडला आहे, आम्ही यासाठी भाजपचे 105 आमदार निवडून दिले नाहीत, असं जनता म्हणत असल्याचं नाना पटोले म्हणाले.
Read also
- “एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा
- “75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा
- “इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”
- “पत्नी, मुलगा नाही तर ड्रायव्हर किंवा चमच्यासाठीही आता नेते उमेदवारी मागतात”; गडकरींनी टोचले राजकारण्यांचे कान
- “उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”