मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा टप्पा अलिकडेच तब्बल दीड महिन्यानंतर पार पडला. यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 असे एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. परंतु त्या मंत्र्यांचं अद्यापही खातेवाटप करण्यात आलं नाही. यावरून आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर खोचक टिप्पणी केली आहे.
“इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”
राजु पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की आम्ही फक्त हिंदुत्वाच्या मुद्दावर एकत्र आलो आहे. बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे न्यायाचे आहेत. असे सांगणारे अजूनही खातेवाटपावर का अडले आहेत ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. त्याचबरोबर बिनखात्याचा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. असं देखील म्हणत त्यांनी जर जनतेला जास्तच गृहीत धरलं जात आहे. अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.
“उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”
दरम्यान, उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. पण मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला मंत्री नाही हा महाराष्ट्रातील समस्त महिलांचा अपमान आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांवर मोठा अन्याय झाला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे कदापि शोभणारे नाही. असं काॅंग्रेस नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
Read also
- बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड
- “..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
- “चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
- “एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा
- “75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा