मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अलिकडेच करण्यात आला. मंत्र्यांना अद्यापही खाती देण्यात आली नाही. अशातच आता पालकमंत्री पद देखील देण्यात आलं नसून 15 ऑगस्ट रोजी आता मंत्र्यांनाच जिल्हामध्ये ध्वजारोहण करण्याचा आदेश दिला आहे. यातच पुण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्यात ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु राज्यपाल पुणे दौऱ्यावर येत असून आता चंद्रकांत पाटील कोल्हापुरला ध्वजारोहण करणार आहेत.
“..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना जिल्ह्या जिल्ह्यांत १५ ऑगस्ट रोजी दिमाखात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या समारंभात पुण्यात दोन व्हीआयपी आणि कोल्हापुरात मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण असे होऊ नये यासाठी शुक्रवारी राज्य सरकारने एक बदल केला. नव्याने मंत्री झालेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुण्याच्या ऐवजी कोल्हापूरला ध्वजारोहण होईल असा निर्णय सरकारने घेतला. कारण पुण्यात राज्यपालांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे. स्वतः राज्यपाल पुण्यात येणार असताना कोल्हापूरला एका मंत्र्याला पाठविणे शक्य झाले आणि चंद्रकांत पाटील यांनी ही जबाबदारी स्वीकारली.
“चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
चंद्रकांत पाटील हे पुण्याचे आमदार आणि मंत्री असताना त्यांना कोल्हापुर येथे ध्वजारोहण कऱण्याची जबाबदारी दिली आहे. यावरून आमदार पुण्याचे अन् ध्वजारोहण कोल्हापुरला असा सवाल पुणेकरांनी केला आहे. चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरचेच असून विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पुण्यात चंद्रकांत पाटलांवर नाराज असणारा गट देखील निर्माण झाला. आता यावरूनच अधिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला .
“एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा
तसेच नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसे व गिरीष महाजन यांच्यात सुरू असलेली चुरस जवळपास थांबल्याचे चित्र आहे. स्वातंत्रदिनाच्या ध्वजारोहणाचा मान महाजन यांना गेल्यामुळे अप्रत्यक्षपणे पालकमंत्रीपदाचा झेंडाही त्यांच्याच हाती गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “जनतेच्या कृपेने रेल्वे मंत्री झालो, पण अजून माझ्या गावात रेल्वे नाही”
- “मराठी बाणा गुजरात्यांच्या चरणी वाहिला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?”
- “असे दलबदलू काँग्रेसमध्ये देखील जातील..”; पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल
- “बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”
- बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड