नाशिक : राज्यात मी 10 वर्ष आमदार आणि त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केलं आहे. सध्या केंद्रात केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून देखील काम पाहिलं आहे. मात्र अजूनही माझ्या गावात रेल्वे नाही. अशी खंत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. ते नाशिक येथे बोलत होते. स्वांतत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी नाशिक येथील स्वांतत्र्यवीर सावरकर स्मारकाराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली.
“चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
गेली 35 वर्ष राजकारणात आहे. आज जनतेच्या कृपेने रेल्वे मंत्री आहे. मात्र माझ्याच गावात आज रेल्वे नाही. गावातली लोक नेहमीच बोलत असतात याचा खुप त्रास असल्याचे रावसाहेब यांनी सांगितले. मात्र पहिल्यांदा देश मग राज्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एखाद्यावेळी मुंबईला फिरायला आलात तर तेव्हा एक रूपयांच तिकीट काढतात. त्या तिकिटासाठी रेल्वे प्रशासन 55 पैसे देते असते. ग्राहकांचे 45 पैसे मिळून ते तिकीट दिले जाते. त्या एक रूपयाच्या तिकिटातून तुम्ही मुंबई फिरून येतात. असं देखील त्यांनी सांगितले.
“एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा
आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष बोत आहेत. मात्र देशातील गरिबी नरेंद्र मोदींच्या काळात कमी झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत भारतात गरिबी होती. त्यानंतर देशातील यांनी एकत्र यायचं ठरविले आणि सर्व गरिब एकत्र झाल्यानंतर देशात गरिबांचा प्रधान मंत्री झाला. त्यावेळी त्यांनी अमृत महोत्सव विषयी देखील त्यांनी लोकांना स्वातंत्र्याचं महत्व पटवून सांगितलं.
Read also
- “मराठी बाणा गुजरात्यांच्या चरणी वाहिला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?”
- “असे दलबदलू काँग्रेसमध्ये देखील जातील..”; पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल
- “बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”
- बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड
- “..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण