मुंबई : गुजरात दंगल आणि इतर गोष्टींवर आधारीत असलेली बीबीसी या न्युज चॅनेलची डॉक्युमेंट्री बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावरून देशात विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टिका केली. त्यातच आता राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप आणि मोदींवर खोचक टोला हाणला आहे.
“ज्यांच्या नावाने राज्य चालवताय, त्यांचं दर्शन घ्यायाला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत बीबीसीने एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या काळातील सर्व घटनांचा त्यात संदर्भ देण्यात आला आहे. गोद्रा कांड, गुजरात दंगल, दिल्लीची दंगल त्याचबरोबर मुस्लिमांची हत्या व इतर गोष्टींचा उलगडा त्यात करण्यात आला आहे. त्यावरून देशात एकच वाद निर्माण झाला. त्यानंतर मग केंद्र सरकारने बीबीसीची डॉक्युमेंट्री बॅन करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून विद्या चव्हाण यांनी मोदींवर टिका केली आहे.
अखेर सत्यजीत तांबेंना भाजपकडून पाठिंबा..! एका रात्रीत सगळं चित्र बदलणार…?
एनडीटीव्हीला अडानीने विकत घेतलं आहे. आता बीबीसीला कोण विकत घेईल. अडानी या अंबानी. असं म्हणत कर लो दुनिया का मीडीया मुठ्ठी में. असा खोचक टोला विद्या चव्हाण यांनी हाणला आहे. प्रसिद्ध वृत्तनिवेदक रवीश कुमार सातत्याने केंद्र सरकारवर टिका करत आहेत. त्यामुळेच मोदींच्या सांगण्यावरून अडाणीने एनडीटीव्हीला विकत घेतले आहे. असंही त्या म्हणाल्या.
मोदी जी #NDTV को अडानी ने खरीद लिया है, अब #BBC कौन खरीदेगा अडानी या अम्बानी ?
“कर लो दुनिया का मीडिया मुट्ठी में”…..— Vidya Chavan (@Vidyaspeaks) January 27, 2023
Read also
- थोरातांचा पाठिंबा नेमका कुणाला ? शुंभागी पाटील कि सत्यजीत तांबे?
- “बरं झालं शिवसेनेतून गद्दार गेले, अन् आम्हाला हिरा सापडला”; उद्धव ठाकरेंचं हिरेंच्या प्रवेशावेळी उद्गार
- “50 गद्दार मांडीवर बसवल्यानंतर भाजपला आमची गरज उरली नाही”, भाजपचा ‘हिरा’ ठाकरे गटात
- “राज्याच्या राजकारणात 2 प्लस 2, चार कधीच होणार नाही, ते मायनसमध्ये जातील”; मुख्यमंत्र्यांचा पलटवार
- शुभांगी पाटीलसाठी राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना मैदानात, विजय आपलाच होणार..!