यवतमाळ : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे निलंबन, सेवासमाप्तीनंतर आता बदलीची कारवाई हाती घेण्यात आली आहे. त्यातूनच शनिवारी उशीरा ५१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांचे महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. एसटी राज्य शासनात विलीन करावी, या एकमेव मागणीसाठी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एसटीची चाके अद्यापही थांबलेली आहेत.
अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती
शासनाने ४१ टक्के पगारवाढ देण्याची घोषणा केली. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला मोजक्याच कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे अद्यापही आंदोलन मिटलेले नाही. शासनाने कर्मचाऱ्यांवर सुरुवातीला निलंबन, सेवासमाप्ती कारवाईचे अस्त्र उगारले. मात्र, कर्मचाऱ्यांनी आंदोलनातून माघार घेतली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३०१ निलंबन तर १०४ सेवासमाप्तीची कारवाई कर्मचाऱ्यांवर झाली आहे.
बच्चू कडू वादात; बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल
तिसऱ्या टप्प्यातील कारवाईमध्ये आज एकूण ५१ कर्मचाऱ्यांच्या विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. शासन विरुद्घ कर्मचारी असा संघर्ष कायम असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहतूकदारांची मनमानी सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप तसेच आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे आंदोलानावर त्वरित तोडगा काढून एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
Read Also :
- भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या अडचणीत वाढ; काँग्रेसच्या छोटू भोयर यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार
- ओमिक्रॉनचं महाराष्ट्रात पाऊल; अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू
- “बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर आणखी काय अपेक्षा करणार”
- “बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर आणखी काय अपेक्षा करणार”
- लहू बालवडकर “फस्ट एड पॉलिक्लिनिक” आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद