अहमदनगर : गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदासंघात अटीतटीची लढत होत आहे. विद्यमान खासदार सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून शरद पवारांनी निलेश लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यातच आता दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार सुजय विखे पाटील सातत्याने निलेश लंके यांच्यावर आरोप करतांना दिसत आहेत. त्यावर आता निलेश लंके यांच्याकडूनही पलटवार केला जात आहे.
हेही वाचा..अर्चना पाटील की ओमराजे निंबाळकर ? धाराशिवच्या कोणत्या उमेदवारांची संपत्ती जास्त ?
निलेश लंके म्हणाले की, माझ्यावर टिका करण्यासाठी मुद्दे मिळत नसल्याने मुंबई, दिल्लीच्या टीम माझ्याविरोधी मुद्दे क्रिएट करण्यासाठी काहींनी आणल्याचं समजत आहे. जनतेनं माझं खरं रूप कोरोनाच्या संकट काळात पाहिलं आहे. ती सगळी जनसेवा करण्याची प्रेरणा मला वारकरी कुटुंबाचा वारसा लाभल्याने मिळाली आहे. मी कोण काय बोलतो याला फारसे महत्व देत नाही. लोकांना कोण संकट काळात आपला आहे. कोण निवडणुकीपुरता आहे हे चांगले माहीत आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. असेही निलेश लंके यांनी म्हटलंय.
हेही वाचा…पहाटेचा शपथविधी कसा आणि का झाला ? अजित पवारांचं दमदार पुरंदरमधील दमदार भाषण
दरम्यान, निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून विखे पाटील त्यांच्यावर कडाडून टिका करतांना दिसत आहेत. कधी कधी लंकेना इंग्लिश येत नाही. तर कधी लंकें फक्त लोकांना भावनिक करीत आहेत. अशी टिका विखे पाटलांकडून केली जात आहे. त्यावर आता निलेश लंके यांच्याकडून देखील त्यांना प्रत्त्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे नगरमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या ३ मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांवर पाणी टाकण्याचं काम मोदींनी केलं”
हेही वाचा…“विरोधकांची प्रचाराची वैचारिक पातळी घसरलीय”, सुनील तटकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…आढळरावांच्या प्रचाराला वेग, वाघोली दौऱ्यात लोकांचा उदंड प्रतिसाद
मोठी बातमी…! धाराशिवमध्ये ७७ उमेदवारांनी १७५ खरेदी केले अर्ज