अहमदनगर : भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अहमदनगर शहराचा दौरा केला. प्रभू श्रीरामनवमीच्या मिरवणूक सोहळ्यात झालेला राडा, नगर शहरात एक विशिष्ट समुदाय बाजारपेठेवर करत असलेले अतिक्रमण, ‘लव्ह जिहाद, धर्मांतराची सक्ती, हिंदूंच्या सणांच्यावेळी गोंधळ या सर्व ज्वलंत मुद्यांवरून नितेश राणे यांनी नगर शहरातून सरकार आणि पोलीस प्रशासनावर तोफ डागली.
पीडित मुलीने आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, मला आनंद वाटत आहे की..;
गेल्या दोन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील सक्तीच्या धर्मांतराच्या घटना, लव्ह जिहादच्या घटना आणि यंदाच्या रामनवमीच्या मिरवणुकीत काही ठिकाणी घडलेले अनुचित प्रकार या सर्व गोष्टींसंदर्भात नितेश राणे यांनी अचानक जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार अमर साबळे, जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे उपस्थित होते.
पीडित तरूणीचे चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट
यावेळी नितेश राणे यांनी पत्रकारांशी सवांद साधताना म्हटलं की यावेळच्या रामनवमी मिरवणुकीत एका विशिष्ट समुदायाकडून नगरमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. काहींनी तर झेंडेही फडकवले. जर पोलीस असतानाही असे प्रकार घडत असतील तर अहमदनगर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अवघड होत जाईल.
“शरद पवारांनी मोदींची भेट घेतली का ईडीची नोटीस पडते”; राज ठाकरे
पीडित हिंदूंनी वारंवार तक्रार देऊनही पोलीस प्रशासन कारवाई करत नाही. जर आता यावेळी पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही तर आता आम्हालाच काही तरी करावे लागेल. पोलिसांनी जर आता हिंदूंसाठी काही केले नाही तर हिंदूंचा तिसरा डोळा उघडेल आणि त्यानंतर जे काही शहरात होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा नितेश राणे यांनी प्रशासनाला दिला आहे. सध्या जे काही राज्यात सुरु आहे ते सरकारच्या आशिर्वादानेच सुरू आहे. थेट नावानिशी वारंवार तक्रारी करूनही सक्तीने धर्मांतर करणाऱ्या राहुरीतील कमलसिंगवर कारवाई होत नाही. रामनवमीच्या मिरवणुकीत जो काही प्रकार झाला तो आपल्या महाराष्टासाठी पोषक आहे का?पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत असतील तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी फक्त हिंदू धर्मावरच आहे का? असा संतप्त सवालही नितेश राणे यांनी विचारला आहे.
Read also:
- “मुंब्र्याचा आव्हाड हा तर फणा काढलेला साप”; राज ठाकरेंनी केली आव्हाडांची नक्कल
- “राज्यात मनसेची सत्ता आल्यास अमेरिकेतून फोन येतील”; ठाण्याच्या सभेत वसंत मोरेंची तोप धडाडली
- माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता; सलिम मामा शेख यांचा ठाण्यातून एल्गार
- गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेचे तारे तोडले; राज ठाकरेंचा हल्लाबोल
- सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; पुत्र नीलचाही जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला