मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना स्फोटक पत्र लिहिलं असून, शिवसेनेच्या नियमबाह्य कामांमुळे आणि दहशतीमुळे, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद पडतील. शिवसेनेच्या नेत्यांकडून अधिकारी, तसेच कंत्राटदारांना भंडावून सोडले जात आहे. त्यांचे म्हणणे न ऐकले गेल्यास, कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
“पुण्याला सर्वाधिक लस देण्यास आम्ही तयार होतो, पण मोदी सरकारने…”, सिरमच्या पूनावालांचा गौप्यस्फोट
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील राष्ट्रीय रस्ते विकासाची कामं रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर आज गडकरींनी या कामांची माहिती घेतल्यावर, स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी या कामात खोडा घातल्याचं त्यांच्या कानावर आलं. यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना, स्थानिक नेत्यांचे असेच प्रकार सुरु राहिले, तर राज्यात रस्त्यांच्या कामांना नवीन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल,” असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गडकरींच्या पत्रात आहे काय?
- अकोला-नांदेड २०२ कि.मी. राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे ४ पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी-वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ कि.मी.) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.
- या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव-रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे एक काम वगळता, बाकीचे काम पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.
- पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे.
- वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.
- उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.
- हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.
उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील – रोहित पवार
ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी, नागपूर मेट्रोच्या एका कार्यक्रमावेळी नितीन गडकरींचे कौतुक करताना, “गडकरींच्या तंत्रज्ञानाची राज्यातील खचलेल्या रस्त्यांना आणि वाहून गेलेल्या पूलांना गरज आहे,” असे कौतुक केले होते.
Read Also :
- गावचा विकास करायचाय, कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेऊ द्या, शिवसेना खासदाराचं राज्य सरकारला साकडं
- राज्यपालांवर भाजपचा दबाव, त्यांनी स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरून घेऊ नये!” राऊतांची खरमरीत टीका
- विरोधकांनी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी किरीट सोमय्याला चुकीची महिती दिली – आमदार सुनिल शेळके
- “काम करणारे पुढे या, फोटोसाठी पुढे पुढे मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा ”, अजित पवारांच्या कानपिचक्या
- बंदी असताना गोपीचंद पडळकरांकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन; ठाकरे सरकार कारवाई करणार ?