– चुकीचे आरोप करून जनतेची दिशाभूल करु नका
मावळ : काल माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर गौण खनिज उत्खनन करत १० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला होता. यावर आमदार सुनिल शेळके यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांनी माहिती घेऊन आरोप करावे ,विनाकारण बेताल आरोप करून जनतेची दिशाभूल करु नये, ”मी जर चुकीचे काम केले तर जनतेने घरी बसवण्या एवजी स्वतः हुन घरी बसेल”परंतू, विरोधांनी केवळ आगामी निवडणूकीचे तिकीट मिळविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी खोटी माहिती दिली, त्यांना खरी माहिती दिली असती तर ते काल मावळात आलेच नसते, असे स्पष्टीकरण देत सुनिल शेळके यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
हे पण वाचा : राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या वादाची याचिका, हायकोर्टाने निकालात काढली; दिला अनपेक्षित निर्णय
काल सोमय्या आणि बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषद घेत शेळके यांनी राजकीय वजन वापरून १० कोटीचा “उत्खनन घोटाळा” केला असल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देण्यासाठी आमदार शेळके यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना शेळके म्हणाले, की मी आजपर्यंत कधीही चुकीचे काम केले नाही. त्यामुळेच तालुक्यातील जनतेने अनेक वर्षाची सत्ता उलथून टाकत मला विक्रमी विजय मिळवून दिला. माझे सर्व काम प्रामाणिकपणे सुरू असल्याने विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिला नाही. त्यांनी केवळ आगामी निवडणूकीत भाजपचे तिकीट मिळावे, यासाठी त्यांनी त्यांनी किरीट सोमय्या यांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी किरीट सोमय्या यांनी अर्धवट माहिती देवून पुढे करत माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. ज्या गट क्रमांकांचा उल्लेख केला आहे. त्यातील कित्येक गट तर माझ्या किंवा माझ्या नातेवाइकांच्या नावावर नाहीत. काही गटातील खाणपट्टा मुदत संपल्याने बंद करण्यात आला आहे, व त्याची सर्व रॉयल्टी भरून रीतसर पंचनामे करून त्या गटातील उत्खनन बंद केले आहे, असेही शेळके यांनी सांगितले.
हे पण वाचा : महाविकास आघाडीला शह देण्यासाठी ‘बिग ४’ तयार, १६ ऑगस्टपासून भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’
ते पुढे बोलताना म्हणाले की, जे खाण पट्टे चालू आहे, त्यांची महसूल विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने रितसर परवानगी दिली आहे. तसेच झालेल्या प्रत्येक ब्रास गौण खनिज उत्खननाची मी रॉयल्टी भरत आहे. असे असताना माझ्या विरोधात विरोधक राज्य पातळीवरून षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परस्पर माझ्या व्यावसायाच्या ठिकाणी जाऊन अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करण्याऐवजी मला सांगितले असते तर मी स्वतः त्यांना सर्व काही फिरून दाखवले असते. इतकेच नव्हे तर मी या व्यवसायातून कसे उत्पन्न मिळवतो व त्यातील काही भाग माझ्या तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी खर्च करतो हेही त्यांना दाखवले असते, असेही आमदार शेळके यांनी सांगितले.
हे पण वाचा : सरकारला सत्तेचा माझं आहे, पुणे पोलिसांची भूमिकाही दुपट्टी; चित्रा वाघ कडाडल्या
विरोधकांनी असे करण्याऐवजी मला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.परंतु तालुक्यातील जनता सुज्ञ असून अशा बेताल बडबड करण्याला महत्त्व देत नाही. तसेच जर मी चुकीचे काम केले तर जनतेने घरी बसवण्याऐवजी मी स्वतः घरी बसेल,इतकेच नाही तर चुकीचे काम केले असे दिसले तरी जनतेच्या आधी माझे वडिलच मला घराबाहेर पडून देणार नाही. त्यामुळे विरोधकांनी असे केविलवाणे आरोप करणे थांबवून माझ्या मागे लागण्यापेक्षा विकासाच्या मागे लागावे जेणेकरून तालुक्यातील जनतेचे भले होईल अशी अपेक्षा शेळके यांनी व्यक्त केली.
Read Also :
- शहर राष्ट्रवादीमध्ये मिशन- २०२२ साठी अजित गव्हाणे यांचा चेहरा; माजी आमदार विलास लांडे केवळ ‘फोटोपुरतेच’ ?
- राज्यपालांवर भाजपचा दबाव, त्यांनी स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरून घेऊ नये!” राऊतांची खरमरीत टीका
- परमबीर सिंह यांना दोन प्रकरणात लूक आऊट नोटीस, कोणत्याही क्षणी बेड्या पडण्याची शक्यता
- मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडवल्या, इथेही वसुली सुरु आहे का? आशिष शेलारांची बोचरी टीका
- युती सरकारच्या काळात झालेल्या कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात आला नवा ट्विस्ट