नांदेड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या मनातली मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. जाहीरपणाने मुख्यंमंत्रिपदाविषयी इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांच्या इच्छेला पाठिंबा दिला असला तरी, यावरून महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आता भोकरमधील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ‘मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही’, असे वक्तव्य वक्तव्य केल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.
ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, असे वक्तव्य अशोक चव्हाणांनी एका कार्यक्रमादरम्यान केले. आता या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत.
दरम्यान, जयंत पाटलांच्या इच्छेविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना विचारले असता, ते म्हणाले की, ‘उद्या मला वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही’ अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केले होती.
Read Also :
- काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार शिंदे आघाडीवर?
- ‘लवकरात लवकर नोकरभरती करा, अन्यथा…’, प्रकाश शेंडगेंचा इशारा
- पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार? अजित पवार म्हणाले…
- ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती – रामदास आठवले
- शेतकरी आंदोलन : फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, मात्र…