मुंबई : कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेले लॉकडाऊन आणि मराठा आरक्षणामुळे मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील नोकरभरती रखडली आहे. पोलीस भरती, आरोग्य विभाग तसेच एमपीएससी मार्फत पदांची भरती होणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्याने, ही भरती पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता लवकरात लवकर नोकरभरती केली नाही तर ओबीसी, भटाके विमुक्त, मागासवर्गीय संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा, समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकरभरती पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यानंतर आता यावर प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश शेंडगे म्हणाले की, मराठा आरक्षणामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या भरत्या मागील 2 वर्षांपासून थांबवलेल्या आहेत. मराठा समाजाच्या 13 टक्के जागांसाठी बाकीच्या 87 टक्के जागांना वेठीस धरलं जात आहे.
राज्यातील काही मंत्र्यांनी नोकरभरती जाहीर केली आहे. मात्र या मंत्र्यांकडून तसे परिपत्रक जाहीर केले जात नाहीये, हे सगळं चुकीचं आहे फक्त मराठा समाजाची नोकरभरती थांबवायची असेल तर थांबवावी पण पूर्ण नोकरभरती थांबवणे चुकीचं आहे, असे शेंडगे म्हणाले. लवकर भरती प्रक्रिया सुरू केली नाही तर मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
Read Also :
- पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार? अजित पवार म्हणाले…
- ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती – रामदास आठवले
- शेतकरी आंदोलन : फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, मात्र…
- मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार महिलेने मागे घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले…
- रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, चित्रा वाघ यांची मागणी