मुंबई : बलात्कारासारखा गंभीर आरोप धनंजय मुंडेंवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
रेणू शर्मा या महिलेने मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. भाजपने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता रेणू शर्माने तक्रारच मागे घेतल्याने हे प्रकरण थंड पडले आहे.
बलात्कारासारखा गंभीर आरोप धनंजय मुंडेवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसानीं करावी
यामुळे ज्या खर्या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो म्हणून खोटे आरोप करणार्यांना शिक्षा व्हायलाचं हवी pic.twitter.com/LnbcpkSPff
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 22, 2021
रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या की, खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसांनी करावी. यामुळे ज्या खऱ्या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो म्हणून खोटे आरोप करणार्यांना शिक्षा व्हायलाचं हवी. हा प्रकार गंभीर असून, यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच रेणू शर्माने तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षआ उमा खापरे यांनी केला आहे.
Read Also :
- मी पुन्हा येईन… आज लोकसभा निवडणुका झाल्या तर अशी असेल स्थिती
- अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी काँग्रेस राज्यभर करणार आंदोलन
- भंडारा दुर्घटनेचा चौकशी अहवाल सादर, आरोग्य विभागाची मोठी कारवाई
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने मागे घेतली तक्रार
- या तारखेला होणार दहावी-बारावीची परीक्षा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती