मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून, त्यांच्या अटकेसाठी आज राज्यभर धरणे आंदोलन केले जाणार आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईच्या ३ दिवस आधी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? याची चौकशी करण्याची गरज असून त्यासाठी गोस्वामीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी काँग्रेस राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार असल्याचे थोरात म्हणाले.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 21, 2021
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का?, असा सवाल देखील थोरात यांनी उपस्थित केला आहे. सोबतच, ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी त्यांनी केली आहे.
अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे Official Secrets Act, 1923, Sec. 5 नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 21, 2021
अर्णब गोस्वामी यांचे कृत्य हे Official Secrets Act, 1923, Sec. 5 नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. TRP घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या व्हॉट्स अप चॅटवरून अर्नब गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध आहेत असे दिसते. अनेक मंत्री व उच्चपदस्थांनी त्याला नियमाच्या पलिकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचे समोर येत आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 21, 2021
दूरदर्शनने माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता त्यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येते. याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला पाठिंबा आहे. त्यामुळेच जनतेचा पैसा लुबाडणा-या अर्नब गोस्वामीविरोधात केंद्र सरकारने कारवाई केली नाही का? या व्हॉट्स अप चॅटवरून अर्नब गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध आहेत असे दिसते. अनेक मंत्री व उच्चपदस्थांनी त्याला नियमाच्या पलिकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचे समोर येत आहे, असा आरोप देखील थोरात यांनी केला.
Read Also :
- भंडारा दुर्घटनेचा चौकशी अहवाल सादर, आरोग्य विभागाची मोठी कारवाई
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने मागे घेतली तक्रार
- या तारखेला होणार दहावी-बारावीची परीक्षा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली
- वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तुरुंगवास