मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे दरम्यान घेण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिलदरम्यान, तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान होतील. या परीक्षांचा निकाल अनुक्रम जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येईल.
एसएससी (इ. १० वी) बोर्डाची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.#sscexams2021#sscexam pic.twitter.com/AXhFsbo9lf
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 21, 2021
कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित केल्या जातील अशीही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, राज्यात इ. 9 वी ते इ. 12 वी च्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Read Also :
- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली
- वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तुरुंगवास
- ‘जिथे जाऊन येतात तिथे आगच लावतात’, सीरमच्या आगीवरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा
- ‘मित्रा, तुला विसरणं आणि दुःख पचवणं कठीण आहे’, धनंजय मुंडे झाले भावूक
- मृतांच्या कुटुंबियांसाठी पुनावालांचा मदतीचा हात, देणार ‘इतके’ लाख