पुणे – ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आता ओबीसी समाजाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या विविध मागण्यासांठी ओबीसी समाज 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करणार आहे. अशी घोषणा ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे.
येथे छत्रपती शिवरायांचे चरण ठेवले होते; दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण
गेल्या अनेक दिवसांपासून इंपेरिकल डेटावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सासू सुनेचे भांडण सुरू आहे. इंपेरिकल डेटावरून कधी राज्य केंद्रावर आरोप करतंय, तर राज्यातले भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर. पण काही केल्या इंपेरिकल डेटाचा घोळ संपेना झालाय. त्यामुळेच आता ओबीसी समाजा आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने इंपेरिकल डेटा सुप्रीम कोर्टाकडे तात्काळ द्यावा, अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे.
लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं – नवाब मलिक
तसेच ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुका तात्काळ थांबवण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसे न झाल्यास 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी मोर्चाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read Also :
- एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर बडतर्फीचा घाव; राज्य सरकार पाठवणार ‘ही’ नोटीस
- “हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या”
- “काँग्रेसला स्वतःची मते राखता आली नाहीत, ते राज्याचे नेतृत्व काय करणार?”
- बावनकुळेंचे गडकरी निवासस्थानी कोडकौतुक; कांचनताई गडकरी यांनी औक्षण करून केले विजयाचे स्वागत
- काँग्रेसची नाचक्की..! काँग्रेसचे उमेदवारला मिळाले केवळ एकच मत..