मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दीड महिन्यापासून बेमुदत संप सुरु आहे. एसटीचे विलगीकरण आणि पगारवाढ या दोन मुद्द्यांवर एसटीचे कर्मचारी आझाद मैदानात आणि प्रत्येक जिल्ह्यातील काही डेपोंमध्ये ठाण मांडून बसले आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारनेही दोन पाऊले पुढे येत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली होती आणि कर्मचाऱ्यांनी संप मिटवण्याची भूमिका घ्यावी असं देखील म्हटलं होतं.
सोमवारचा शेवटचा अल्टिमेटम परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आला होता. आता परिवहनमंत्री अनिल परबांनी दिलेला अल्टिमेटम संपला आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
सचिन सावंत धावले राऊतांच्या मदतीला; शब्दकोशातील ‘त्या’ शब्दाचा अर्थ दाखवला..
कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आजपासून कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपर्यंत कामावरती हजर राहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावा लागणार असल्याच परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता. त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही त्यानंतर राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे.
अशी होते ‘कारवाई’
जे कर्मचारी कामावर हजर राहिले नाहीत त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात येणार आहे. या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात किंवा पंधरा दिवसांचा विशिष्ट कालावधी दिला जातो. त्यानंतर तीन सुनावणी होते आणि सुनावणीत जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस दिली जाते. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा सात दिवसांचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाते.
गृहमंत्री वळसे पाटलांच्या सचिवाच्या गाडीची काच फोडली; 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला
सरकारने यापूर्वीच ‘मेस्मा’ कायद्याद्वारे १२ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून सरकार आणि संपकऱ्यांतील संवाद संपुष्टात आला आहे. दरम्यान, २० डिसेंबरला या प्रकरणातील न्यायालयीन आदेशाकडे संपकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
Read Also :
- “हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या”
- “काँग्रेसला स्वतःची मते राखता आली नाहीत, ते राज्याचे नेतृत्व काय करणार?”
- बावनकुळेंचे गडकरी निवासस्थानी कोडकौतुक; कांचनताई गडकरी यांनी औक्षण करून केले विजयाचे स्वागत
- काँग्रेसची नाचक्की..! काँग्रेसचे उमेदवारला मिळाले केवळ एकच मत..
- “त्यांच्या बापाशी लढून मी त्या पक्षामधून बाहेर पडलो. हे त्यांनी विसरू नये”