मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरतील तर सरकार देखील कोसळू शकते. त्यामुळे याची उत्सुकता आता अधिक लागून राहिली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपला बी प्लॅन तयार असल्याचंही सांगितलं आहे.
हेही वाचा…राहुल नार्वेकरांच्या निकालाआधीच एकनाथ शिंदेंनी जाहीर केला निकाल, म्हणाले…
शिवसेना अपात्र आमदारांच्या निकालावर काल देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमचं सरकार स्थिर राहिल. आमची युती कायदेशीर असल्याचेही सांगत विधानसभा अध्यक्षांचा निकाल आमच्या बाजूने लागेल. असेही त्यांनी सांगितले. तसेच निकाल आता तरी भाजपकडे प्लॅन बी तयार आहे. असेही त्यांनी नमुद केले आहे.
हेही वाचा…“तर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार,” राजकीय हालचालींना वेग
दरम्यान, एकनाथ शिंदे या निकालात अपात्र ठरले तर महायुती नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होतील. महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा असून बहुमतासाठी १४५ आमदारांचं समर्थन आवश्यक आहे. यातच भाजप, अजित पवार गट आणि अपक्ष मिळून नवीन सरकार स्थापन केला जाण्याची शक्यता आहे. यातच २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपकडे १०५ आमदार आहेत. तर अजित पवार गटाकडे ४० आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे जरी अपात्र ठरले तर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाईल आणि भाजप सत्तेत राहील अशी राजकीय वर्तुळात शक्यता वर्तवली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निकाल आधीच ठरलाय..! राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाची आक्रमक भूमिका
हेही वाचा…“खासदार हेमंत पाटलांचं बळ वाढलं,” मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत जाहीर सभा
हेही वाचा…राहुल नार्वेकर कोणत्या गटाच्या आमदारांचा गेम करणार? वाचा संपुर्ण यादी
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर वकिल उज्ज्वल निकम यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…मुंबईत ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार, पक्षाला बसला मोठा हादरा