कोल्हापूर : राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर दोन मोठे राजकीय भूकंप झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडली तर अजित पवारांनी शरद पवारांच्या साथ सोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या दोन राजकीय घडामोडीनंतर अनेकांनी पक्ष प्रवेश केलेत. यातच मागच्या ग्रामपंचायत निवडणुका असतील किंवा इतर काही यामुळे अजित पवारांचा दबादबा वाढला. यानंतर अनेकांनी अजित पवार गटात येण्याचा निर्णय घेतला. तर गडहिंग्लज मधील बड्या नेत्यांनी अजित पवार गटात येण्याचा मार्ग पत्कराला असल्याने यामुळे अजित पवार गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक ; आजी माजी आमदार, नगरसेवकांचा समावेश
गडहिंग्लज येथील जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील या तिघांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे शहारातील जनता दलाला मोठा हादरा बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुंबईत बुधवारी पक्ष प्रवेश होणार असल्याचे बोलण्यात येत आहे.
हेही वाचा…शरद मोहोळ ह’त्या प्रकरणात मोठी बातमी समोर, मोहोळ ह’त्या प्रकरणात आता गुन्हे शाखेची एंन्ट्री
दरम्यान, शहरातील विनोद बिलावर, अॅड सतीश इटी यांच्यासह करंबळीचे भाजप सरपंच अनुप पाटील यांचाही प्रवेश असल्याचे खणगावे यांनी सांगितले आहे. गेल्या वेळी सभागृहात स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल पालिकेवर सत्तेवर आला होता. सभागृहाची मुदत संपण्यापुर्वीपासून या पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू होती. अनेक वेळा त्यात दुरूस्तीचा प्रयत्नही झाला. परंतु त्यात यश आले नाही.
READ ALSO :
हेही वाचा…राहुल नार्वेकरांच्या निकालाआधीच एकनाथ शिंदेंनी जाहीर केला निकाल, म्हणाले…
हेही वाचा…“तर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार,” राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…अजितदादांनी आखली मोठी रणनिती, अमोल कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार रिंगणात, आढळराव पाटलांचं काय होणार ?
हेही वाचा…“तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार,” माजी मुख्यमंत्र्यांनी केला मोठा दावा
हेही वाचा“सुनील केदारांची आमदारकी त्यात तत्परतेने पुन्हा बहाल करावी, ” विरोधकांची मागणी