मुंबई : शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकांवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. ठाकरे गटाचे १४ तर शिंदे गटाचे १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकरणाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यावरून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…मनसेच्या दोन्ही गटात मोठा राडा, मनसेच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून हाणलं
राहुल नार्वेकर यांना शिंदेंच्या आमदारांना अपात्र करावं लागेल. जर या आमदारांना अपात्र केलं नाही तर पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागेल. किंवा मग पुढे काय करायचं ते जनता ठरवेल. असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच पक्षांतर बंदी कायद्यात बदल करण्याची गरज आहे. हा कायदा पक्षांतर बंदी संदर्भात अपयशी ठरला आहे. हा कायदा सोपा केला पाहिजे. अशी मागणी देखील चव्हाणांनी यावेळी केली.
हेही वाचा…नगर दक्षिण लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा, विखे पाटलांनी एका वाक्यात संपवून टाकला
दरम्यान, पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत. १६ आमदार जर अपात्र झाले आणि त्यांचे पद गेले तर राजकीय भूकंप होईल. अशी प्रतिक्रिया चव्हाणांनी दिलीय. तसेच घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहायला हवे. अतिशय महत्वाचा राजकीय निर्णय असेल. घटनात्मक पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा १९८५ मध्ये आला. या कायद्याचे उदिष्ठ पुर्ण झालेलं नाही. या कायद्याला बदलाया हवे असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा“सुनील केदारांची आमदारकी त्यात तत्परतेने पुन्हा बहाल करावी, ” विरोधकांची मागणी
हेही वाचा…पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक ; आजी माजी आमदार, नगरसेवकांचा समावेश
हेही वाचा…शरद मोहोळ ह’त्या प्रकरणात मोठी बातमी समोर, मोहोळ ह’त्या प्रकरणात आता गुन्हे शाखेची एंन्ट्री
हेही वाचा…निकालाच्या आधी नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, राहुल नार्वेकरांनी दिलं भेटीचं कारण, म्हणाले…
हेही वाचा…“काॅंग्रेसचे नेते सुनील केदारांना कोर्टाचा मोठा दिलासा ; ” ‘या’ प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर