मुंबई ; शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर उद्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालाचे वाचन केले जाणार आहेत. परंतु त्याआधीच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधानसभा अध्यक्ष दोन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटतात. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. परंतु न्यायमूर्ती आरोपीला भेटत असतील तर उद्या न्यायाची काय अपेक्षा करणार? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यावरही आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पलटवार केलाय.
हेही वाचा…चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’, आमदार महेश लांडगे यांचा बैठकीत जागेवर तोडगा
माजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ही ३ जानेवारी रोजी नियोजित होती. परंतु ती होऊ शकली नाही. कारण मी आजारी होतो. तीन ते चार दिवस घराबाहेर पडता आलं नाही. तब्येत सावरल्यानंतर रविवारी मतदारसंघातील काही महत्वाचे प्रश्न, विधिमंडळातील काही प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यासोबत तातडीची बैठक घेऊन चर्चा करणं अत्यंत महत्वाचं होतं. त्यामुळे त्यांची भेट घेतली अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…मोदींनी लोकसभेची निवडणूक नाशिकमधून लढवावी ; नाशिकच्या साधू महंतांचे नरेंद्र मोदींकडे साकडे
साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे. त्याच्याच ज्यांची केस आहे. त्यांनी ती केस मांडणं, याच्यात काही चुकीचं नाही. ज्यांच्यासमोर मांडली जातंय. ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे. ते गृहस्थ ज्यांची केस आहे, त्यांच्याकडे जात असतील. तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा यातून निर्माण होतेय. असं शरद पवारांनी सांगितलं. मुंबई विमानतळावर जयंत पाटील आणि अनिल देसाई यांना भेटलो मग ते पण हेतपुरस्पर होतं का ? भेट झाल्यावर चर्चा होतेय. गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या ज्या आमदारांवरती अपात्रतेची याचिका दाखल झाली आहे. त्यापैकी एकही मला भेटला नाही का ? असा सवालही नार्वेकरांनी उपस्थित केला.
READ ALSO :
हेही वाचा…“काॅंग्रेसचे नेते सुनील केदारांना कोर्टाचा मोठा दिलासा ; ” ‘या’ प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
हेही वाचा…मनसेच्या दोन्ही गटात मोठा राडा, मनसेच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून हाणलं
हेही वाचा…नगर दक्षिण लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा, विखे पाटलांनी एका वाक्यात संपवून टाकला
हेही वाचा…“तर ४० गद्दार बाद होऊन अपात्र होतील”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“उद्धवसाहेबांच्या शिवसेनेची दहशत भाजपच्या मनात”, ईडी आयटीच्या कारवायांवरून ठाकरे गटाची मोठी टिका