मुंबई : 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी याकुब मेननच्या कबरीवरून सध्या राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मात्र भाजपने महाविकास आघाडीवर टिका करण्यास सुरूवात केली आहे. त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे.
“प्रत्येकाला बारामती मतदारसंघ हवासा वाटणे, यात काही गैर नाही”; सुप्रिया सुळे
याकुब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होते. ते सांगायचे की आदित्य ठाकरे आपले भाऊ आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम झाले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आशीर्वाद मिळाला. तर याकुबच्या कबरीचे सौदर्यं, सुशोभीकरण करणं होणार ना. मैदाने, उद्याने स्माशनभूमी यांचे सुशोभिकरण, देखभाल, दुरूस्ती संपुर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. तुम्ही 25 वर्ष सत्तेत बसलात, महापौर तुमचा तरी ही याची खबर कशी नाही मिळाली? ही जबाबदारी तुमचीच आहे. पण माझी खुर्ची, माझा परिवार या पलिकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही अशी टिका भाजपचे नेते आशिष शेलारांनी केली आहे.
“तेव्हा उद्धव ठाकरे अन् आघाडी सरकार झोपा काढत होते का ?” मनसेचा सवाल
सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते हे आम्ही पाहिले आहे. सत्तेतील शिवसेना जेव्हा विरोधी पक्षात गेली तेव्हा मात्र आता दाऊदचे प्रचारक झाले आहेत. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात, महाराष्ट्रात मुंबईत बॉम्बस्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकुब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कशी दिली ? असा सवाल देखील आशिष शेलारांनी केला.
आशिष शेलारांच्या टिकेला शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलाराचे अनेक फोटो आहेत. ज्यात ते मौलानांना पेढे भरवत आहेत. टोपी घालून बसलेले पण फोटो आहेत. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे जातं ? शिवसेनेने फक्त देशविरोधी मुस्लिमांचा राग केला आहे. मातोश्रीवर अनेकदा अनेकांनी नमाज पठणही केले आहे. वाड्याची साल पिंपळाला आणि पिंपळाची साल वडाला लावण्याचा हा प्रकार आहे. केवळ उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रकार सुरू असल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं आहे.
“तेव्हा याकुब मेमनची कबर सजवत बसले अन् आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका”
आशिष शेलारांकडे 2017 मध्ये आणि आता पण मुंबईची जबाबदारी आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी कितीही टिका केली. तरी त्यांची लोकप्रियता काही कमी होत नाही. सर्व हिंदू संघटना उद्धव ठाकरेंकडे जातात आहे. हे बघून आशिष शेलार बावचळले आहेत. मुळात ज्या पद्धतीने हा आरोप होतो आहे. हे आरोप बिनबुडाचे आहेत, हे लोकांना कळत आहे. जामा मशीद ऑफ बॉम्बे ट्रस्ट ही खुप जूनी संस्था आहे. ते कब्रस्थानही याचं ट्रस्टचं आहे. त्यामुळे हे सर्व या ट्रस्टमार्फत झाले आहे. यामध्ये काडीचाही संबंध मुंबई महापालिकेचा नाही. महाविकास आघाडी सरकारचाही यात संबंध नसल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.
Read also
- “शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? डरपोक गट” केदार दिघेंचा शिंदेंवर निशाणा
- “भाजपमध्ये विलीन व्हा, नाहीतर स्वत:चा पक्ष काढा, जनतेला त्रास का ?” रूपाली पाटील
- “राहुल गांधींची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी”; सुप्रिया सुळे
- “मंत्रीपदासाठी शिंदे गटात सहभागी झालो नाही, मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; बंडखोर आमदार
- “शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार का ?” शालिनी ठाकरेंचा पेडणेकरांना सवाल