सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टीचा जो उन्माद आणि माज होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी उतरवला. हे फक्त सरकारचं लक्ष विचलीत करण्याचं काम करत आहेत. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने केलेला थयथयाट आणि नाटक बघून सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून भाजपचा माज उतरवला, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
भाजपने गेल्या वर्षभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत प्रकरण असेल किंवा ईडी-सीबीआयचा गैरवापर करून आपल्या विचारांचे जे लोक नाहीत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं, असा आरोप त्यांनी केला.
कोरोना बाधितांचे आकडे जरी कमी झाले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना चाचण्या कमी झाल्या, असा आरोप करायचे. मृत्यू कमी झाले तर म्हणायचे मृत्यू दडवले. हा गेल्या एका वर्षातला थयथयाट पाहून लोकं कंटाळली होती.
या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं, अशी टीका मुश्रीफ यांनी केली. कोरोना संकटात राज्याचं आर्थिक स्त्रोत बंद झालं. तरी राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला वेतन दिलं, याची पोचपावती लोकांनी दिली, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतिश चव्हाण (राष्ट्रवादी)
नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजीत वंजारी (काँग्रेस)
पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड (राष्ट्रवादी)
पुणे शिक्षक मतदारसंघ – जयंती आसगावकर (काँग्रेस)
अमरावती शिक्षक मतदारसंघ – किरण सरनाईक (अपक्ष)
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची पोटनिवडणूक – अमरिशभाई पटेल (भाजप)
Read Also :
बॉक्सिंग महासंघ निवडणुकीच्या रिंगणात आशीष शेलार?
‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं’, मंत्री सतेज पाटलांचा टोला
नितीन गडकरींची तरतूद आणि श्रेयवादाच्या लढाईत कोल्हे, लांडगे, आढळराव पाटलांमध्ये चढाओढ
“लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक आहे का?”; निलेश राणे यांचा अजित पवारांवर हल्ला
येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा