मुंबई – भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यापार्श्वभूमीवर शिवतीर्थवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. त्यामुळे उद्याच्या अल्टिमेटमबाबत राज ठाकरे मनसे नेत्यांना काय सूचना देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मग राज ठाकरे चैत्यभूमीवर आजवर का नाही गेले? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना प्रतिसवाल
राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप राज यांनी केला.औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे आजच्या मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे कोणती नवी घोषणा करणार, याकडे सर्वांचेलक्ष लागेल आहे.
मनसे बॅकफूटवर; ३मे ची ‘महाआरती’ स्थगित, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मशिदीवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात आणि हनुमान चालिसासंदर्भात राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे पाहावे लागले. हे पाहता आज शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.दरम्यान रमजान ईद निमित्त मनसेने एक पाऊल मागे घेत आजचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द केला. स्वतः राज ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचे, हे मी माझ्या ट्वीटद्वारे आपल्यासमोर मांडेन,असे राज ठाकरे यांनी काल केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Read also:
- राज ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू
- भाजपाला मोठा धक्का; “संभाजीराजेंचं काँग्रेसमध्ये स्वागत”; सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
- ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा’, अबू आझमींचं राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र
- फडणवीसांना अक्कल दाड, राणे संपलेलं दुकान, तर ओवेसी देश विघातक; विनायक राऊतांची जोरदार फटकेबाजी
- “अशांतता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही”; रोहित पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं
- “राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर” अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं