सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या विचारांनी अभिप्रेत असलेलं स्वराज्य घडवलं होतं. आज महाराष्ट्र घडताना त्याच विचारांनी अभिप्रेत महाराष्ट्र घडला पाहिजे. स्वराज्य घडत असताना अनेक जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येत प्राणांची आहुती देत स्वराज्य घडवलं. आज महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं तेढ निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत. अशी अशातंता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही , असा राष्ट्रवादी युवा नेते रोहित पाटील यांनी सांगितलं आहे.
“नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र
महाराष्ट्राचं नेतृत्व संपुर्ण देशात शरद पवार करीत आहेत. महाराष्ट्राची अडचण देशपातळीवर मांडायची असेल त्याठिकाणी शरद पवार अग्रभागी असतात. त्यामुळे मला महाराष्ट्राला शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. एखादी टिका करायची असेल्यास ती शक्ती स्थळावर केली जात आहे म्हणून ती टिका शरद पवारांवर केली जात आहे. आतापर्यंत जातीपातीमध्ये भिडवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. यांना कुणीही थारा दिला नाही, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्राला संताची पंरपरा आहे. त्यामुळे या सर्व पंरपरांना राज्यातील जनता सोबत घेऊन विकास करतील. असं त्यांनी सांगितलं. सांगलीतील कॉलेज येथे शिवजयंती निमित्त रोहित पाटिल आले असता त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
दरम्यान, दुसरीकडे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या टिळकांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून बघणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावरून राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे.
Read also:
- “राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर” अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
- राजकारण तापलं! “ओळख ना पाळख..भटमान्य टिळक म्हणत संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंवर टिका
- “संजय राऊतांचा बाबरी मशिदीशी काय संबंध”; राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर
- प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री, काढणार स्वत:चा पक्ष…!
- “महागाई अन् बेरोजगारीचं अपयश लपवण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना सुपारी”; पटोलेंची भाजपवर खरमरीत टिका