पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा, ठाण्यानंतर औरंगाबादमध्ये मागील काही महिन्यातील तिसरी सभा पाड पडली. या सभेत त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत वक्तव्य केलं आहे. त्यावरून त्यांच्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, यांच्यानंतर आता संभाजी ब्रिगेडचे राज्य संंघटक संतोष शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
ओळख ना पाळख.. भटमान्य टिळक म्हणत संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना फैलावर घेतलं. क्रांतिसूर्य महात्मा फुलेंनी १८६९ मध्ये किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीची स्वच्छता केली आणि पुण्यात शिवजयंती उत्सव सुरु झाला. शिवसमाधीच्या देखभालीसाठी त्यांनी मुंबई गव्हर्नरकडून अनुदान मंजूर करुन घेतले. न्या. रानडेंनी १८८५ मध्ये शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी स्थानिक प्रशासनाकडून फंड मिळवण्यासाठी पुण्यात सभा घेतली. असं संतोष शिंदे म्हणाले आहेत.
“विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
ते पुढे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांचा १८९४ मध्ये आपल्या राज्याभिषेकावेळी ‘शिवशक’ पुन्हा चालू केला. त्यापूर्वीच त्यांचे वडील आबासाहेब घाटगे यांनी रायगडावर इंजिनिअर पाठवून शिवसमाधीच्या जिर्णोद्धारासाठी आराखडाही तयार केला होता, पण दुर्दैवाने आबासाहेबांचे निधन झाले. काम थांबले. शाहू महाराजांनी जेव्हा रायगडावरील शिवसमाधीचा विषय हाती घेतला तेव्हा टिळकांनी पुण्यात सभा घेऊन त्यात खोडा घातला. ही समाधी एकट्या शाहू महाराजांऐवजी सर्व जनतेच्या आर्थिक योगदानातुन व्हावी अशी त्यांनी घोषणा केली.
“सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका
दरम्यान, दुसरीकडे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या टिळकांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून बघणार का, असा सवालही ठाकरेंनी केला होता.
टिळकांनी १८९५ मध्ये रायगडावरील शिवसमाधीचा जीर्णोद्धार करायचा म्हणुन निधी उभा करण्यासाठी पुण्यात सभा घेऊन “शिवाजी फंड” समिती काढली. लोकांनीही शिवरायांच्या समाधीसाठी उत्स्फूर्तपणे मदत केली. शाहू महाराजांनी शिवाजी क्लब, शिवाजी फंडसाठी मोठी मदत केली. पण टिळकांनी त्यावेळी शिवसमाधीच्या जिर्णोद्धारासाठी जमा झालेला निधी १८९६ मध्ये रायगडावरील शिवाजी उत्सवासाठी खर्च केला. पुढे १९०१ च्या वेदोक्त प्रकरणात टिळकांनी छत्रपती शाहू महाराजांविरोधात भूमिका घेतली आणि रायगडावरील शिवसमाधीचा विषय रखडत गेला.
Read also:
- “संजय राऊतांचा बाबरी मशिदीशी काय संबंध”; राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर
- प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री, काढणार स्वत:चा पक्ष…!
- “महागाई अन् बेरोजगारीचं अपयश लपवण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना सुपारी”; पटोलेंची भाजपवर खरमरीत टिका
- “नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र
- “छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची मिश्किल टिप्पणी