औरंगाबाद – गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये युती होती. त्यादरम्यान आमची हिंदुत्वाची भूमिकाही एकच होती. पण आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. यापार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना चुप्पी साधून आहे.त्यामुळे मनसेने मशिदीवरील भोंगा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आवाज उचलला. भाजपही सुरवातीपासून हिंदुत्वाचा पुरस्कार करते. जे पक्ष हिंदुत्वाची भूमिका माडतात त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे विधान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी केले.
अक्षयतृतीयाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश
येत्या काळात भाजप -मनसेची युती होणार का? यावरही कराड यांनी भाष्य केले. दोन्ही पक्षाच्या युती संदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निर्णय घेतील, असे ते म्हणाले.हिंदुत्वावरून आमचा राज ठाकरेंना पाठिंबा आहे. . यामुळे भोंगे उतरविण्यासाठी पक्षाने सांगितल्यास भाजप कार्यकर्ते भोगे उतरवतील, तसेच भोंगे उतरवण्यापेक्षा आम्ही हनुमान चालीसाही म्हणू शकतो, असे कराड म्हणाले.
प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री, काढणार स्वत:चा पक्ष…!
हनुमान जयंतीला आम्ही हनुमान चालीसा म्हणून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे आम्हालाही हनुमान चालिसा मुखपाठ असल्याचे कराड म्हणाले. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे राज ठाकरे शहरात आल्यावर मी त्यांचे स्वागत केले. तसेच माझा मुलगा यांनी राज ठाकरे यांना मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारोहाचे निमंत्रण दिले, अशी माहितीही कराड यांनी दिली. हे आमंत्रण स्वीकारून राज ठाकरे रिशेप्शनसाठी आले, या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुभाष देसाई,आरोग्यमंत्री राजेश टोपे, अमित देशमुख यांच्यासह चार ते पाच पक्षातील नेते आले होते. यादरम्यान राज ठाकरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या टीकेलाही कराड यांनी उत्तर दिले. आपण खासदार व केंद्रात मंत्री झाल्यापासून शहरासाठी ३० ते ३५ कोटींचा निधी आणल्याचा दावा कराड यांनी केला. मात्र खैरेंनी केवळ पत्र व्यवहाराच केल्याचे ते म्हणाले.
Read also:
- भाजपाला मोठा धक्का; “संभाजीराजेंचं काँग्रेसमध्ये स्वागत”; सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
- ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा’, अबू आझमींचं राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र
- फडणवीसांना अक्कल दाड, राणे संपलेलं दुकान, तर ओवेसी देश विघातक; विनायक राऊतांची जोरदार फटकेबाजी
- “अशांतता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही”; रोहित पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं
- “राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर” अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
- राजकारण तापलं! “ओळख ना पाळख..भटमान्य टिळक म्हणत संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंवर टिका