मुंबई : वीज बिलाबाबत राज्यातील जनतेत तीव्र भावना आहेत. त्यामुळे या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ संदर्भात ही एक हजार कोटी रुपयांची मदत राज्याने मागितलेली असताना, केंद्राने अवघ्या २६८ कोटींची मदत केली आहे. त्याबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते शब्द ही बोलत नाही. महाराष्ट्रात अनेक संकट आलेले असताना केंद्राची महाराष्ट्र बद्दलची भूमिका दुटप्पी आहे, दुजाभावची आहे, वडेट्टीवार म्हणालेत.
अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे वर्ष आर्थिक, नैसर्गिक सर्व प्रकारचे संकट घेऊन आले आहे. अजून केंद्राने ३८ हजार कोटींचा जीएसटीचा परतावा दिलेला नाही. विदर्भात ज्या चार जिल्ह्यात महापूर आला होता, तिथे आतापर्यंत २०० कोटींचा वाटप शेतकऱ्यांना केला आहे. या चार जिल्ह्यांसाठी ७०० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे.मात्र, अजून ही केंद्र सरकारने एका दमडीची मदत केलेली नाही, असे ते म्हणालेत.
महाआघाडी सरकारने दिले, भाजपच्या काळात काय मिळाले?
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, धानाला वाढीव भाव दिले, बोनस दिला. भाजपच्या काळातही धानाला बोनस दिला नव्हता. आता कोणत्या तोंडाने भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला मतदान केले नव्हते का, त्यांचे एवढे खासदार जनतेने निवडणून दिले मग भाजप नेते केंद्राकडे शेतकऱ्यांसाठी मदत का मागत नाही, अशी टीका केली आहे. भाजप नेते लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत की महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. मात्र, विरोधी पक्ष नेते अर्धवट ज्ञानाने आरोप करत आहेत, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला.
Read Also ;
मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न; संजय राऊतांचा आरोप
…मग तुम्ही सत्तेत कशासाठी बसला आहात?, चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “