जालना : शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रामनगर येथील साखर कारखाना खरेदीविक्रीच्या व्यवहारादरम्यान १०० कोटींचा घोटाळा केला आहे. तसेच आता ते कारखान्याची १ लाख कोटींची जवळपास २५० एकर जमीन बळकाविण्याच्या प्रयत्नात आहेत असा सनसनाटी आरोप भाजपच्या किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर, आज अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरावर ईडीने छापा टाकल्याची माहिती आहे.
३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम: २१ डिसेंबर रोजी होणार मतदान
औरंगाबाद शहर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे येऊन सोमय्यांनी सेनेच्या माजी मंत्र्यावर आरोप केल्याने भाजप-सेना वाद आणखी चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना येथे ईडीची छापेमारी झाली होती. त्यानंतर, सक्तवसुली संचालयाने आज अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरावर छापेमारी केली. येथे आज सकाळी साडेआठ वाजता ईडीचा छापा पडला. खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून खोतकर यांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात ईडीचं पथक झाडाझडती करत आहे. या पथकात एकूण १२ जण कार्यरत आहेत. आतमधून दरवाजे बंद करण्यात आले असून कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये.
मी भाजपात प्रवेश करतोय, म्हणताच शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे झाले अवाक्
अर्जुन खोतकर यांच्या राम नगर येथील साखर कारखान्याचा व्यवहार असल्याची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली होती. तसेच, हा व्यवहार २०१२ ते २०२१ या दरम्यान झाला. दोन्ही ठिकाणाचे व्यापारी आणि उद्योगपती यांच्या माध्यमातून अर्जुन खोतकर यांनी जवळपास १०० कोटींचा घोटाळा केला आहे. आता खोतकर हे कारखान्यास शेतकऱ्यांनी दिलेली जवळपास १ लाख कोटींची २५० एकर शेतजमीन ताब्यात घेण्याची तयारी सुरु आहे. माझ्याकडे संबंधित शेतकरी आणि काही व्यक्तींनी माहिती दिली, त्यावरून मी ईडी, राज्य सरकार आणि आता केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
Read Also :
- पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार- नाना पटोले
- कोल्हापूरात काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध; भाजपच्या अमल महाडिकांची निवडणूकीतून माघार
- मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार आहे; नारायण राणेंच्या दाव्याने उडाली खळबळ
- चंद्रकांत पाटलांपाठोपाठ देवेंद्र फडणवीसही दिल्लीत दाखल; मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत?
- आठमुठेपणा घेऊन एसटी सेवा ठप्प ठेवली तर कारवाई करावीच लागेल; अनिल परबांचा इशारा