औरंगाबाद : पुण्यात रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर औरंगाबादमध्येही मनसेतील नाराजी उफाळून आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर जिल्ह्याच्या कार्यकारणीत फेरबदल करण्यात आले. यात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचा तडकाफडकी पदावरुन बाजूला करत पुन्हा ही जबाबदारी सुमित खांबेकर यांच्याकडे देण्यात आली. मात्र हा निर्णय का घेतला? याची कल्पनाही दाशरथे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना नव्हती.
ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा – नाना पटोले
२ वर्षापूर्वीच सुहास दाशरथे यांनी शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर दाशरथे यांना जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. औरंगाबादच्या विविध आंदोलनात सुहास दाशरथे प्रखरतेने पुढे दिसले. राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येणार म्हणून सुहास दाशरथे यांनी स्वागताची जय्यत तयारी केली. परंतु या दौऱ्यातच त्यांच्याकडून जिल्हा अध्यक्ष पद काढून घेण्यात आले. त्यामुळे दाशरथे नाराज झाले.
किरीट सोमय्याच्या रडारवर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे; ‘त्या’ घोटाळ्याची ईडीमध्ये तक्रार दाखल
सुहास दाशरथे म्हणाले की, मला पदावरुन बाजूला केले आहे. मी महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन. परंतु साहेब माझं चुकलं काय? मी काम करतोय. पक्ष संघटनेची बांधणी करतोय. मग माझं चुकलं कुठे हा प्रश्न माझ्या मनाला पडलाय. परंतु साहेबांनी जी जबाबदारी सोपवली ती निष्ठेने पार पाडण्यास मी तयार आहे. मी पुन्हा महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करायला तयार आहे. फक्त हे का घडलं याचं स्पष्टीकरण हवं आहे असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत माझ्याकडे फक्त निष्ठा आणि स्वाभिमान या दोष्टी आहेत. शिवसेनेतही त्याच निष्ठेने आणि स्वाभिमानानं काम केले. यापुढेही राजसाहेब जो निर्णय घेतील त्याच आधारे काम करणार आहे असं सुहास दाशरथे यांनी सांगितले.
Read Also :
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश
- चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव
- बैलगाडा शर्यतीचा लढा: सुप्रिम कोर्टाच्या सुनावणीत उद्या अंतिम निर्णय, आमदार महेश लांडगे यांची माहिती