मुबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांकडून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
“उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार”;शरद पवार
महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्र दौरा; आदित्य ठाकरेंना देणार टक्कर ?
मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना, की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय? आता तरी. ऊठ मराठ्या ऊठ. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल, अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटावर टोला लगावला आहे.
“वाह रे भाजप, कुणी बार चालवतंय, तर कुणी कुंटणखाना”; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा
राज्यपाल भगतसिंह कोशारी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. याआधी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी राज्यातील थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी कलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. तर यावेळी त्यांनी मुंबईच्या निमित्तानं मराठी माणसावर निशाणा साधला आहे. यामुळे मुंबईतील मराठी माणुस राज्यपाल यांच्यावर टीका करताना दिसत आहे.
काय ती झाडी..
काय तो डोंगर..
काय नदी..
आणि आता…
काय हा मराठी माणूस ..
महाराष्ट्राचा घोर अपमान!
50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत..
जय महाराष्ट्र… pic.twitter.com/U30CdS0TSW
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
आता तरी..
ऊठ मराठ्या ऊठ..
शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे..
बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..
मराठ्या तुलाच उठावे लागेल.. pic.twitter.com/QYX4weHdQ2— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा
आहे…
105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता..
मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना.
की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे..
स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा..
दिल्ली पुढे किती झुकताय? pic.twitter.com/qhjQ3nGEwf— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
Read also
- “मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला तर…;” राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांचा इशारा
- जिद्द बाळगणाऱ्या ३१४ अपंगांना लक्ष्मण जगताप व बंधू शंकर जगताप यांचा हात मदतीचा; कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप
- एकाच नाण्याच्या दोन बाजू; अन् आदित्य ठाकरेंनी अजान सुरू असताना थांबवले भाषण
- “बाळासाहेबांचा नातू, उद्धव ठाकरेंचा पुतण्या शिंदेंच्या भेटीला”; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
- “त्यामुळे ओबीसी हा सत्तेच्या अन् प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल”; शरद पवारांना चिंता