रत्नागिरी : महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. यात नारायण राणेंचा देखील समावेश आहे. आपल्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर राणे यांनी माझ्या जीवाचे काही बरे -वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा दिला होता. यावर आता शिवसेनेचे खासदार खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिला आहे.
नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
राणेंना दहशतवाद्यांपासून धोका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
राणेंच्या दोन्ही मुलांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व उपलब्ध होते. पण दोघांनाही त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेता आला नाही. नीलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत, अशी जोरदार टीका देखील त्यांनी राणे कुटुंबियावर केली.
Read Also :
- मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, गिरीश महाजनांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- सर्वात प्रथम मोदी आणि उद्धव ठाकरेंनी लाईव्ह टिव्हीवर लस घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी
- ‘आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा सोडा’, खोत यांचा शेट्टींना टोला
- ‘तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही’, राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल
- आरक्षणाविषयी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, अशोक चव्हाणांची माहिती