मुंबई : केंद्र तसेच राज्य सरकारच्या माहितीनुसार जवळपास ९५ टक्के केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाया या विरोधी पक्षातील नेत्यांवर झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून युवकांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेतले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बारामती अॅग्रो कंपनीबाबत आज रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. त्याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत ईडीच्या कार्यालयाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आव्हान येत राहतील. परंतु अत्यंत ताकदीने या आव्हांनाना आम्ही सामोरे जाऊ. सत्याचाच विजय होईल. असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्यामुळे अशा कोणत्याही चौकशाला आम्ही समोरे जाऊ असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यातच इडीच्या कारवाई आधी रोहित पवारांनी अजित पवारांशी संपर्क साधला होता का ? असा सवाल करताच मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. कारण मी आजच मुंबईला आल्याचे सुळें सांगितले.
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
दरम्यान, रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जात असतांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले? हे कशासाठी ? यावर बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही. प्रेम ही असतो आणि आदरही असतो. रोहित पवार यांचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातील प्रेम आणि आस्था आणि कार्यकर्त्यांना वाटतं असेल की आपला भाऊ एकटा लढत असेल तर आपणही याठिकाणी यावं, असेही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…रामलल्लाच्या मिरवणूकीवर दगडफेक, मग थेट बुलडोझर कारवाई, मीरा रोडवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, रोहित पवारांवर ईडीची कारवाई का ? प्रकरण काय ?
हेही वाचा…मोठी बातमी…! “कॉंग्रेस करणार पुणे लोकसभा जिंकण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवाराची घोषणा”
हेही वाचा…“पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच…”जितेंद्र आव्हाडांचं सुचक विधान
हेही वाचा…ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, ठाकरे गटाने मांडले हे चार ठराव ?