ठाणे : प्रभू रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त मिरवणूकीवर मीरा रोडवर एका जमावाने दगडफेक केली होती. त्यानंतर ठाणे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी विरोधकांनी राज्य सरकावर सडकून टिका केल्यानंतर गृहमंत्र्यांनी मीरा रोडवरील आरोपींवर धडक कारवाई सुरू केली. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. परंतु आता याच परिसरात मीरा भाईंदर महापालिकेने अतिक्रमण केलेल्या दुकानांवर बुलडोझर कारवाई केल्याने याची एकच चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती
२२ जानेवारीच्या राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने उत्साह आणि आनंद व्यक्त करणाऱ्या काही गाड्यांवर हल्ला करण्यात आला होता. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओत गाड्यांची नासधूस तसेच काही व्यक्तींवर हल्ला झाल्याचं दिसून आले. त्यानंतर दगडफेक करण्यांवर कडक कारवाईचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
हेही वाचा…“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार”?
त्यानंतर काल नया नगर भागात कारवाई करण्यात आली. मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून मीरा रोड येथील नया नगर भागातील अतिक्रमण हटवण्यात आले. बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यात आले. त्यानंतर या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, रोहित पवारांवर ईडीची कारवाई का ? प्रकरण काय ?
हेही वाचा…मोठी बातमी…! “कॉंग्रेस करणार पुणे लोकसभा जिंकण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवाराची घोषणा”
हेही वाचा…“पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच…”जितेंद्र आव्हाडांचं सुचक विधान
हेही वाचा…ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, ठाकरे गटाने मांडले हे चार ठराव ?
हेही वाचा…आगामी महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा, निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती