पुणे : गेली तीन दिवस बाहेर असताना मन अस्वस्थ झाले होते. या दरम्यान शरद पवार साहेबांकडून मार्गदर्शन घेत होतो. आजवर कोणतीही भूमिका घ्यायची वेळ आली, तेव्हा साहेबांशी बोलून सल्ला घेतो. सध्याच्या सरकारमध्ये युवकांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं, असं स्वत:ला विचारलं, त्यानंतर साहेबांचा सल्ला घेतला. त्यानंतर युवकांशी संपर्क साधण्यासाठी युवा संघर्ष यात्रा काढण्याचा विचार आम्ही केला. त्यानंतर दसऱ्यापासून पुण्यातून आम्ही पायी यात्रा काढणार असून ती नागपूरला संपणार असल्याची माहिती आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आज दिली आहे.
हेही वाचा…काॅंग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता भाजपही जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
युवक संघर्ष यात्रा कधी, केव्हा सुरू होणार ?
दसऱ्याच्या दिवशी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून पुण्यातील लाल महाल, देहू आळंदी संत पिठाला नतमस्तक होत यात्रेला सुरुवात होईल. एकूण ८२० किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. १३ जिल्ह्यामध्ये ही यात्रा प्रवास करेल. या यात्रेदरम्यान कोणतीही गाडी, सायकल वापरणार नसून पायी चालत दिवसाला १७ किलोमीटर तसेच जास्तीत जास्त २३ किमी चालणार आहोत. या युवा संघर्ष यात्रेत फक्त शरद पवारांचा फोटो असेल. यात्रेत कोणताही लोगो नसणार असून कुणालाही सहभाग घेता येणार असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. ७ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात देखील युवकांचे प्रश्न मांडण्यात येणार आहे. युवा संघर्ष यात्रा यापूर्वी पासूनदेखील माझ्यावर कारवाई सुरू आहे. आता देखील नोटीस आली तरी संघर्ष यात्रा काढली जाईल. मी हार मानून घरी बसणार नाही. युवक त्यांच्या प्रश्नांवर किती गंभीर आहेत हे सरकारला दाखवून देऊ. असा इशाराही रोहित पवारांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
संघर्ष यात्रेत सरकारकडे मागण्या काय असणार ?
भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, कुटुंब फोडले तरीही आम्ही लढत आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून हजार रुपये का घेता प्रश्न विचारल्यावर सरकार विद्यार्थी सिरियस नाहीत म्हणतात. आंदोलने, उपोषण केले तरी केवळ शब्द मिळतो. कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी, विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी हजार रुपये फी रद्द करण्यात यावा व आजवर घेतलेले १००० रुपये परत करण्यात यावेत, दत्तक देण्यात येणाऱ्या शाळांचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशा मागण्या या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचंही रोहित पवारांनी सांगितलंय.
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
तानाजी सावंतानी राजीनामा द्यावा
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर रूग्णालयात झालेल्या घटनेवरही रोहित पवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. रुग्णांना औषधे मिळत नाहीत. मंत्री तानाजी सावंत आणि हाफकिनचे जवळचे नाते आहे. त्यांनी आजच राजीनामा द्यायला हवा, जाहिराती करून हिरो बनण्याचा प्रयत्न तुम्ही करता, मात्र उद्या कुटुंबासाठी हिरो बनणारी लहान मुले दगावत आहेत. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये बसून फाईल मंजूर केली जाते. महात्मा फुले जीवनदायी योजनेतून बिल पास करण्यासाठी देखील पैसे घेतले जातात. महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेची बिकट अवस्था बनली आहे. लहान मुलांच्या आणि इतर रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार व्यक्तींनी राजीनामा द्यायला हवा. असं म्हणत रोहित पवारांनी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा लगावला.
बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी
२०१४ पासून केंद्र सरकारने इम्परियल डाटा दाबून ठेवल्याने obc चे राजकीय आरक्षण गेले, बिहारप्रमाणे महाराष्ट्रात देखील जातीय जनगणना व्हायला हवी. अशी मागणी देखील रोहित पवारांनी राज्य सरकारकडे केली आहे.
काही लोकांना भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवावी लागेल
शिंदे गटाचे १६ आमदार बाद करण्याचा कोर्टाच्या माध्यमातून भाजपचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच विस्तार केला जाईल. काही लोकांना भाजपच्या चिन्हावर लोकसभा लढावी लागेल, त्यांच्याकडे कोणतेही चिन्ह राहणार नाही. असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंची ताकद वाढली, आतापर्यंत ठाकरेंचे ३५ नगरसेवक फोडले, काॅंग्रेसच्या महिला नेत्यालाही लावलं गळाला
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, सगळ्यांनी पुन्हा मिळून एक व्हा”, आव्हाडांनी कुणाला केलं आवाहन ?
हेही वाचा…“घाटी रुग्णालयात मृ’त्यू’चा थैमान..! किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ?
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदाराकडून फडणवीसांचा ‘फडतूस’ उल्लेख, भाजपकडून जोरदार प्रहार होणार ?
हेही वाचा…“संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले, तेव्हाच राऊतांसारखी त्यांची वक्तव्ये”, शिंदे गटाने डिवचलं