नवी दिल्ली : देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी होत असताना बिहार राज्यात जातीय जनगणना पार पडली आहे. जातीय जनगणना व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतरही कायद्याचे अनेक अडथळे पार करत बिहारची जातगणना पार पडली आहे. यावरून आता महाराष्ट्रात देखील जातीय जनगणना व्हावी, अशी मागणी होत आहे. यावर आता बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी राज्यातील राजकीय नेत्यांकडून होत आहे.
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील मागणी केली आहे. आव्हाड म्हणाले की, बिहारच्या जातीनिहाय जनगणनेतून संपूर्ण भारताच्या एकूणच सामाजिक स्थितीच दर्शन होत आहे, आणि हीच संपूर्ण परिस्थिती आपल्या देशाची असणार आहे. या जातीनिहाय जनगणनेमुळे मागासवर्गीय त्याच्या अधिकारांपासून,त्याच्या हक्कापासून किती वंचित राहीला आहे हे लख्खपणे दिसून येत आहे. संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात देखील जातीनिहाय जनगणना झालीच पाहीजे, आमची मागणी आहे.
हेही वाचा…“बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी”, वडेट्टीवारांची राज्य सरकारकडे मागणी
दरम्यान, कांशीरामजी नेहमी म्हणायचे “जिसकी जितनी संख्या भारी,उतनी उसकी हिस्सेदारी”. त्यांच्या या मताशी सहमत आहे. मागासवर्गीयांची (OBC +SC+ST) जर एकूण लोकसंख्या ही 80 ते 84 टक्के इतकी असेल तर त्यांना 50 टक्क्यांच्या आतमध्येच आरक्षण ठेवा अस म्हणणे म्हणजे संपूर्ण मागासवर्गीय समाजावर अन्याय करण्यासारखे आहे. महाराष्ट्राने विधीमंडळामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव पारित केला आहे आणि त्याला तत्कालीन विरोधी पक्षनेता आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाठिंबा दिला आहे. विधानसभेमध्ये सगळ्यांनी केलेली भाषणं आणि तिथे पारित झालेला ठराव, यावर महाराष्ट्र विश्वास ठेवतो. महाराष्ट्राच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. सगळ्यांनी पुन्हा मिळून एक व्हा आणि महाराष्ट्रामध्ये जातीनुसार जनगणनेला सुरुवात करा. हे सर्व सामान्यांचे गरीबांचे सरकार आहे,अस राज्य सरकारच म्हणणं त्यांनी खर करून दाखवावे आणि गरीबांना गरीबांचे अधिकार मिळवून द्यावा. असंही रोहित पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“घाटी रुग्णालयात मृ’त्यू’चा थैमान..! किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ?
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदाराकडून फडणवीसांचा ‘फडतूस’ उल्लेख, भाजपकडून जोरदार प्रहार होणार ?
हेही वाचा…“संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले, तेव्हाच राऊतांसारखी त्यांची वक्तव्ये”, शिंदे गटाने डिवचलं
हेही वाचा…काॅंग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता भाजपही जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?