नवी दिल्ली : देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी होत असताना बिहार राज्यात जातीय जनगणना पार पडली आहे. जातीय जनगणना व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतरही कायद्याचे अनेक अडथळे पार करत बिहारची जातगणना पार पडली आहे. यावरून आता महाराष्ट्रात देखील जातीय जनगणना व्हावी, अशी मागणी होत आहे. यावर आता बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदाराला प्रचार करण्याची लगीनघाई, पाहा नेमकं काय घडलं ?
बिहार सरकारचे अभिनंदन करतो, त्यांनी जातीनिहाय जनगणना केली आणि आकडे जाहीर केले. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी. याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा. राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न समोर आले असताना जातीनिहाय जनगणना हाच एक उपाय आहे. असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“दिल्लीतून आर्मी बोलवा, ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार”
दरम्यान, बिहार सरकारने केलेल्या जातनिहाय जनगणनेत मागास २७ टक्के, अति मागास ३६ टक्के, दलित १९ टक्के, अनुसूचित जमाती २ टक्के, खुल्या प्रवर्गातील लोकांची संख्या १५ टक्के दाखवण्यात आली आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष असतांना महाराष्ट्र विधानसभेत देखील महाविकास आघाडीच्या काळात हा ठराव मंजूर केला होता. परंतु पुढे काहीच झालं नाही.
बिहार सरकारचे अभिनंदन करतो, त्यांनी जातीनिहाय जनगणना केली आणि आकडे जाहीर केले.
बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी.
याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा.
राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न समोर आले असताना जातीनिहाय जनगणना हाच एक उपाय आहे.… pic.twitter.com/6dtPVFdPPG
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“चुकीची प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची काही घटकांकडून भूमिका”,शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“पालिकेकडून कोटींचा निधी लाटला, पण अद्यापही कामांना सुरूवात नाही”, शिंदे सरकारमधील ‘या’ आमदारांचा अजब कारभार
हेही वाचा…आमदार बेनकेंची डबल ढोलकी सुरूच, काल साहेबांच्या मंचावर, तर ७ ला दादांचा जंगी कार्यक्रम
बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, जु्न्नरचं राजकारण तापणार
हेही वाचा…“बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी,” मंत्री दिपक केसरकर म्हणाले की..,”