मुंबई : मीरा भाईंदर शहरातील सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन यांनी गेल्या वर्षाभरात गाजावाजा करत भूमिपुजन केलेल्या 47 कामे प्रत्यक्षात सुरूच नसल्याचे समोर आलं आहे. राज्य शासनाने महापालिकेला ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून गाता जैन यांनी ३१ तर प्रताप सरनाईक यांनी १९ कामे सुचवली होती. यातील काही कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपुजन केले होते. मात्र अद्याप काहीही न झाल्याचं समोर आलं आहे. यावरून आता ठाकरे गटाने जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“वाघनखं खरंच महाराजांची असतील तर मग ती भाड्याने का आणताय?” ठाकरे गटाचा भाजपला सवाल
मीरा भाईंदरमधील मिंधे-भाजप पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन ह्यांनी गेल्या वर्षभरात केवळ विकासाची गाजरं जनतेला दाखवली. पालिकेकडून कोटींचा निधी लाटला आणि विकासकामांचा धुरळा निव्वळ हवेत उडवला! खुद्द घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विकासकामांचा शुभारंभ झाला. पण प्रत्यक्षात मात्र कामे कागदावरच राहिली. अजून किती दिवस जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून सत्तेचा मलिदा खाणार? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा…धनंजय मुंडे निवडणुक आयोगाचे अध्यक्ष झालेत का ? सुप्रिया सुळेंचा मुंडेंना खोचक सवाल
दरम्यान, आम्ही शहराच्या विकासासाठी या कामांसाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता. मधल्या काळात ही कामे करण्यासाठी महापालिकेपुढे काही तांत्रिक अडचणी उद्धवल्या होत्या. या सर्व अडचणी दुर झाल्या असून लवकरच ही कामे केली जाणार असल्याचं गीता जैन यांनी म्हटलं आहे. तर रखडलेली कामे लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आमदार बेनकेंची डबल ढोलकी सुरूच, काल साहेबांच्या मंचावर, तर ७ ला दादांचा जंगी कार्यक्रम
बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, जु्न्नरचं राजकारण तापणार
हेही वाचा…“बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी,” मंत्री दिपक केसरकर म्हणाले की..,”
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदाराला प्रचार करण्याची लगीनघाई, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…“दिल्लीतून आर्मी बोलवा, ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार”