पुणे : आज सबंध देशामध्ये वेगवेगळी घटक वेगवेगळ्या पद्धतीने आपली पावले टाकत आहेत. पण दुसऱ्या बाजूने अन्याय, अत्याचार हे चित्र एका बाजूला आणि धर्म, विचारांच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टींचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळते. माझ्या मते, कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचा पुरस्कार कधी करत नाही, चुकीचे संस्कार कधी समाज बांधवांवर करत नाही, योग्य विषय देण्याच्या संबंधीची खबरदारी ते घेतात. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितले. पुण्यात वारकरी संमेलनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
हेही वाचा…“दिल्लीतून आर्मी बोलवा, ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार”
भारत देश अनेक जाती-धर्माचा व भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार जो आहे तो विचार हिंदूंचा असो किंवा मुस्लिमांचा असो, अन्य घटकांचा असो त्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका ही प्रकर्षाने मांडली जाते. त्याचाच पुरस्कार करणं व ते रुजवणं आणि ते शक्तिशाली करणं खऱ्या अर्थाने याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता भागवत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजवू शकतो याची मला खात्री आहे. असंही शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…“वाघनखं खरंच महाराजांची असतील तर मग ती भाड्याने का आणताय?” ठाकरे गटाचा भाजपला सवाल
वारकरी संमेलन ही संकल्पनाच मुळी समतेचा, माणुसकीचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यासाठी हा पुढाकार या ठिकाणी घेतला गेला. आज समाजामध्ये ज्याप्रकारे अस्वस्थता आहे, चुकीची प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची भूमिका काही घटक घेतात त्यामुळे सामान्य माणूसाची अस्वस्थता काढून टाकण्यासाठी, त्याला मानसिक समाधान देण्यासाठी, त्याचं मन शक्तिमान करण्यासाठी जे काही पर्याय आज समाजासमोर आहेत त्यामध्ये वारकरी संप्रदायाचा विषय आणि विचार हा आपण दुर्लक्षित करू शकत नाही ते सूत्र घेऊन गेले काही तास आपण या ठिकाणी बसलो. हेच सूत्र घेऊन उभं आयुष्य समाजाचं मन तयार करण्याची कामगिरी करणारे जे कुणी असतील, कीर्तनकार असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांचं जे योगदान आहे त्यांच्या योगदानाचा सन्मान आज या ठिकाणी करण्यासंबंधीचा कार्यक्रम आहे. असंही ते म्हणालेत.
READ ALSO :
हेही वाचा…“पालिकेकडून कोटींचा निधी लाटला, पण अद्यापही कामांना सुरूवात नाही”, शिंदे सरकारमधील ‘या’ आमदारांचा अजब कारभार
हेही वाचा…आमदार बेनकेंची डबल ढोलकी सुरूच, काल साहेबांच्या मंचावर, तर ७ ला दादांचा जंगी कार्यक्रम
बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, जु्न्नरचं राजकारण तापणार
हेही वाचा…“बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी,” मंत्री दिपक केसरकर म्हणाले की..,”
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदाराला प्रचार करण्याची लगीनघाई, पाहा नेमकं काय घडलं ?