नवी दिल्ली : देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी होत असताना बिहार राज्यात जातीय जनगणना पार पडली आहे. जातीय जनगणना व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतरही कायद्याचे अनेक अडथळे पार करत बिहारची जातगणना पार पडली आहे. यावरून आता महाराष्ट्रात देखील जातीय जनगणना व्हावी, अशी मागणी होत आहे. यावर आता बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. तर महाराष्ट्रात ओबीसी समाजाचा डेटा तयार व्हावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
हेही वाचा…आमदार बेनकेंची डबल ढोलकी सुरूच, काल साहेबांच्या मंचावर, तर ७ ला दादांचा जंगी कार्यक्रम
महाराष्ट्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे व ते वाचविण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर केंद्रातील मोदी सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसींचे हित साधले आहे. ज्याप्रकारे बिहारमध्ये सर्व समाजाचा डेटा तयार करण्यात आला. त्याच प्रकारे महाराष्ट्रातही ओबीसी समाजाचा डेटा तयार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे करणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते हिंगणघाट (जि. वर्धा) येथे ओबीसी जागर मेळाव्यात बोलत होते.
हेही वाचा…बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, जु्न्नरचं राजकारण तापणार
भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. सेवाग्राम येथून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात १६०० किमीचा प्रवास करणार आहे. विदर्भातील ९ लोकसभा क्षेत्रातून ही यात्रा ओबीसींसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा जागर करणार आहे. शेतकऱ्यांचे हित साधले जावे, युवकांना रोजगार मिळवा, महिलांचे कल्याण व्हावे आणि ओबीसीमध्ये सामील असणाऱ्या १८ पगड जाती, १२ बलुतेदार व ३५० हून अधिक उपजातींना न्याय मिळवून देण्याचे काम जागर यात्रा करेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
हेही वाचा…“बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी”, वडेट्टीवारांची राज्य सरकारकडे मागणी
हेही वाचा…“चुकीची प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची काही घटकांकडून भूमिका”,शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“पालिकेकडून कोटींचा निधी लाटला, पण अद्यापही कामांना सुरूवात नाही”, शिंदे सरकारमधील ‘या’ आमदारांचा अजब कारभार