पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकारण एका वेगळ्याच दिशेने चालले आहे. त्यातच आता सेनेच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची वाट धरल्याने उद्धव ठाकरे यांना जबरदस्त अजून एक धक्का बसला आहे. या सर्व प्रकरणात मात्र राज्यातील राजकीय नेत्यांकडून शिवसेना फोडण्यामागे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यावरून पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष रूपाली पाटील यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
“मुखर्जी, वाजपेयींबद्दल बोलता अन् दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं पाप करता”
रुपाली पाटील यांनी आपल्या ट्विटवर लिहिलं आहे की, शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की शरद पवार यांना मध्ये आणतात. बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वत:च्या हिंमतीवर करा, कशाला तुमचे खापर शरद पवार साहेबांवर फोडता ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच सरतेशेवटी त्या म्हणाल्या की, सत्तापिपासुमुळे वाण नाही पण गुण लागला वाटत तुम्हाला असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आधी रड रड रडले, नंतर दिला थेट इशारा; “आमच्यामुळे खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये”
राज्यात एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना सुरूंग लावण्याचे काम केले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे गटालाच धक्का दिला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण एका वेगळ्याच मार्गावर चालेलं आहे. तसेच राज्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण घडताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य नागरिक या सर्व घटनांना वैतागून गेली आहे.
“पुर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत”
शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. पक्षाविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेतुन रामदास कदम आणि आनंदराव अडसुळ यांची पक्षातुन हाकालपट्टी केली आहे. कालपर्यत उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले पुणे जिल्हयातील मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यानी ही शिंदे गटाची वाट धरली आहे. शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील ही शिवसेनेतुन बाहेर पडले आहेत.
Read also
- भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणुक; पुणे पोलिसांकडुन तक्रार दाखल
- पक्षाच्या वटवृक्षावर घाव घालण्याचं पाप आपण करू नये; संजय जाधवांचं बंडखोरांना आवाहन
- “शिंदे-ठाकरे वादात भाजपची चांदी”; शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर
- “शिवसेना आज पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही”; रामदास कदम
- “बहुतेक सय्यद बंडा अन् विश्वप्रवक्ते हे दोघेच नवाब यांच्या बरोबर राहतील”