पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील भाषणांमुळे राज्यात पुन्हा एकदा हिंदूत्वाचा मुद्दा समोर आला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.तसेच मशिदीवरील भोंगे खाली उतरावा अन्यथा त्यापेक्षा मोठ्या आवाजात हनुमान चालिला वाजवण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर पुण्यातील मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रूपाली पाटील यांनी याबाबत महत्वपूर्ण भाष्य केले आहे.
राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यांवर मुस्लिम समाज नाराज! पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक येतात. त्याठिकाणी प्रत्येक वेळी राज ठाकरे हे राज्यातील बेरोजगारी, महागाई ,पेट्रोल डिझेल वाढ अशा ज्वलंत मुद्यांवर भाषण करतात. तर गुढीपाडव्याच्या सभेत फायर ब्राॅंड नेत्याला काय झालं होतं? असा प्रश्न संपुर्ण महाराष्ट्राला पडलं आहे. परंतु यावेळी इडीच्या सुडबुद्धीने त्यांना असं भाषण करण्यास भाजपने भाग पाडलं, असा आरोप रूपाली पाटील यांनी भाजपवर केला आहे.
“जो हिन्दू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणताही जातीभेद मानत नाही. या पक्षात सुरूवातीपासून अनेक जातीधर्माचे लोक काम करत आहेत. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलीली टीका अत्यंत चूकीची आहे. सध्या पेट्रोल, डिझेल वाढ, महागाई, भाववाढ, असे विषय असताना भाजपकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही आहे. त्यामुळे उगाचच राज्यात राजकीय गोंधळ निर्माण झाला पाहिजे, म्हणून राज ठाकरे यांच्या कडून भाजपने बोलून घेतलं आहे.
“शेण खाणारी राष्ट्रवादीची औलाद आमची नाही”; मनसेची राष्ट्रवादी, शिवसेनेवर जहरी टीका
दरम्यान, भाजप मनसेचा वापर करून घेत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्याचबरोबर मशिदीसमोर हनुमान चालिसा लावायचं की नाही. हे प्रत्येक कुठल्याही धर्माने कायद्याच्या चौकटीत राहुन केले पाहिजे. पुण्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. कदाचित त्यांच्या भावना कुठतंरी दुखावल्या असतील म्हणून त्यांनी राजीनामे दिले असतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.
Read also:
- शिवसेनेचे 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात; प्रसाद लाड यांचा दावा
- कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही; रिपाइंची राज ठाकरेंविरोधात कारवाई करण्याची मागणी
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांना विरोध; पुण्यात वसंत मोरेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
- कोल्हापूरात राजकीय आखाडा तापला; प्रचारासाठी मैदानात उतरली युवा नेत्यांची फौज
- “ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला?”; सतेज पाटलांचा भाजपला खोचक सवाल